संसदेचे पावसाळी अधिवेशन ११ ऑगस्टला संपले. मणिपूर हिंसाचार, महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी पावसाळी अधिवेशन गाजवले. याच मुद्द्यांवरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. दरम्यान, आता सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवरून दिली आहे.

हेही वाचा >> पाच मजली इमारतीला भीषण आग, लहान मुलांसह ७३ जणांचा होरपळून मृत्यू; ‘ती’ एक चूक पडली महागात!

Krishnamai festival begins in Sangli from today
सांगलीत आजपासून कृष्णामाई उत्सव
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
CET exam applications marathi news
सीईटीचे अर्ज भरण्यासाठी अजून एक संधी, दुसऱ्यांदा मुदतवाढ; पाच अभ्यासक्रमांचे अर्ज १० फेब्रुवारीपर्यंत भरता येणार
Demolition drive against illegal chawls in Titwala-Manda
टिटवाळा-मांडामध्ये बेकायदा चाळींच्या विरुध्द तोडकामाची मोहीम
Congress forms panel to monitor ‘conduct of free and fair elections
निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसची समिती; मतदारयाद्यांमधील घोळाचा आढावा घेण्याचा निर्णय
rules for RTE admissions Change, Committee Education Department
आरटीईच्या प्रवेशांसाठीच्या नियमांमध्ये होणार बदल… शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना
Narendra Modi on foreign meddling
Narendra Modi : “गेल्या १० वर्षांतील हे पहिलेच अधिवेशन, ज्यात…”; विदेशी हस्तक्षेपावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला!
All-party meetings in Parliament
अर्थअधिवेशन आजपासून, पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत; अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता

“संसदेचे विशेष अधिवेशन (१७ व्या लोकसभेचे १३ वे अधिवेशन आणि राज्यसभेचे २६१ वे अधिवेशन ) १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत बोलावले आहे. या अधिवेशनात पाच बैठका होणार आहेत. अमृत ​​काल दरम्यान संसदेत महत्त्वाची चर्चा होण्याची अपेक्षा आहे”, अशी माहिती प्रल्हाद जोशींनी दिली. दरम्यान, या अधिवेशनात कोणत्या मुद्द्यावरून चर्चा होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. तसंच, १८ ते २२ सप्टेंबर काळात महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम असणार आहे. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी बदलावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

९ आणि १० सप्टेंबर रोजी दिल्लीत जी २० शिखर परिषद होणार आहे. या परिषदेनंतरच या विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. पण, अधिवेशनाचा अजेंडा अद्याप उघड करण्यात आलेला नाही.

दरम्यान, २० जुलै रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले होते. हे अधिवेशन ११ ऑगस्टला संपले. या पावसाळी अधिवेशनात लोकसभेने २२ विधेयके तर राज्यसभेने २५ विधेयके मंजूर केली. दोन्ही सभागृहांनी २३ विधेयके मंजूर करून पुढची प्रक्रिया सुरू केली आहे.

हेही वाचा >> “जम्मू-काश्मीरमध्ये कधीही निवडणुका घेण्यास सज्ज”; केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

सुप्रिया सुळेंनी केली तारीख बदलण्याची मागणी

१८ -२२ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनाविषयी नुकतीच माहिती मिळाली. या अधिवेशात अर्थपूर्ण चर्चा आणि संवाद होईलच. पण महाराष्ट्रात याच काळात गणेशोत्सव असणार आहे. त्यामुळे या तारखेबाबत केंद्रीय संसदीय कार्यमंत्री विचार करतील, अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली आहे.

दरम्यान, या विशेष अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवरून चर्चा होणार याबाबत अद्यापही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे या चर्चेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader