संसदेचे पावसाळी अधिवेशन ११ ऑगस्टला संपले. मणिपूर हिंसाचार, महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी पावसाळी अधिवेशन गाजवले. याच मुद्द्यांवरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. दरम्यान, आता सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवरून दिली आहे.

हेही वाचा >> पाच मजली इमारतीला भीषण आग, लहान मुलांसह ७३ जणांचा होरपळून मृत्यू; ‘ती’ एक चूक पडली महागात!

MPSC Agricultural Services, MPSC, court order,
‘एमपीएससी’ कृषी सेवा: न्यायालयाच्या आदेशानंतरही नियुक्ती देण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Municipal bus drivers and conductors went on indefinite strike affecting peoples on Navratris first day
नवरात्रच्या पहिल्याच दिवशी ‘आपली बस’ची चाके थांबल्याने नागपूरकरांचे हाल…भाजप समर्थित संघटनेनेच…,
jayant patil latest news
कार्यकर्त्यांनी घोषणा देताच संतापले जयंत पाटील; म्हणाले, “असा पोरकटपणा करणार असाल तर…”
allahabad hc on krishna kanmabhumi shahi Idgah dispute
कृष्ण जन्मभूमी-शाही इदगाह प्रकरणी पुन्हा नवी तारीख; ३० सप्टेंबर रोजी होणार पुढील सुनावणी
what is quad grouping
QUAD संघटना नेमकी काय आहे? भारतासाठी या संघटनेचे महत्त्व काय?
Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरलेल्या अर्जाचे पैसे कधी येणार? लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांनी दिली माहिती
rto workers association to go on indefinite strike from september 24 after talks with transport commissioner fail
परिवहन आयुक्तांशी आरटीओ संघटनेची चर्चा निष्‍फळ; २४ सप्टेंबरपासून बेमुदत संप अटळ

“संसदेचे विशेष अधिवेशन (१७ व्या लोकसभेचे १३ वे अधिवेशन आणि राज्यसभेचे २६१ वे अधिवेशन ) १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत बोलावले आहे. या अधिवेशनात पाच बैठका होणार आहेत. अमृत ​​काल दरम्यान संसदेत महत्त्वाची चर्चा होण्याची अपेक्षा आहे”, अशी माहिती प्रल्हाद जोशींनी दिली. दरम्यान, या अधिवेशनात कोणत्या मुद्द्यावरून चर्चा होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. तसंच, १८ ते २२ सप्टेंबर काळात महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम असणार आहे. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी बदलावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

९ आणि १० सप्टेंबर रोजी दिल्लीत जी २० शिखर परिषद होणार आहे. या परिषदेनंतरच या विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. पण, अधिवेशनाचा अजेंडा अद्याप उघड करण्यात आलेला नाही.

दरम्यान, २० जुलै रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले होते. हे अधिवेशन ११ ऑगस्टला संपले. या पावसाळी अधिवेशनात लोकसभेने २२ विधेयके तर राज्यसभेने २५ विधेयके मंजूर केली. दोन्ही सभागृहांनी २३ विधेयके मंजूर करून पुढची प्रक्रिया सुरू केली आहे.

हेही वाचा >> “जम्मू-काश्मीरमध्ये कधीही निवडणुका घेण्यास सज्ज”; केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

सुप्रिया सुळेंनी केली तारीख बदलण्याची मागणी

१८ -२२ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनाविषयी नुकतीच माहिती मिळाली. या अधिवेशात अर्थपूर्ण चर्चा आणि संवाद होईलच. पण महाराष्ट्रात याच काळात गणेशोत्सव असणार आहे. त्यामुळे या तारखेबाबत केंद्रीय संसदीय कार्यमंत्री विचार करतील, अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली आहे.

दरम्यान, या विशेष अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवरून चर्चा होणार याबाबत अद्यापही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे या चर्चेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.