पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेषत्वाने लक्ष असलेल्या गंगा नदीच्या शुद्धीकरण प्रकल्पासाठी केंद्र शासन आता २५ विशेष गटांची स्थापना करणार असून गंगा नदीचे प्रदूषण कोणत्या स्रोतातून मुख्यत्वे होते हे शोधून काढले जाणार आहे. त्यानुसार पुढील कृती ठरणार आहे.
जलस्रोत मंत्रालयांच्या विविध विभागांमधील लोकांचे गट स्थापन केले जाणार असून हे गट हिवाळी मोसमात गंगा नदीत कोणकोणत्या मार्गाने पाणी येते आणि उद्योगांचे सांडपाणी नेमके कोठून येते ते तपासले जाणार आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्याची शक्यता असून गंगा नदी वाहते त्या सर्व राज्यांमध्ये हे काम हाती घेतले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
उदाहरणार्थ, कानपूर येथे हे विशेष गट जाऊन तेथील पाच किंवा सहा नाल्यांची तपासणी करून माहिती तपशीलवार मांडतील. त्याआधारे सांडपाणी पुनर्वापराचे प्रकल्प किती हाती घ्यावे लागतील याचीही माहिती गोळा केली जाणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
उद्योगांकडून सोडले जाणारे पाणी किती आहे, कोणकोणत्या ठिकाणांहून हे पाणी गंगा नदीत सोडले जाते याची तपासणी केल्यानंतर भविष्यातील कृती आराखडा तयार करणे शक्य होणार आहे. गंगा नदीचे प्रदूषण कोणकोणत्या घटकांमुळे आणि नेमके कोणत्या स्रोतांमधून होते हे शोधल्यानंतर त्यावरची उपाययोजना करणे शक्य होणार आहे. हिमालयातील गंगोत्री येथून नदीचा उगम झाला असून भागीरथी हे गंगेचे मूळ नाव असून तेथून ही नदी बंगालच्या उपसागराला मिळेपर्यंत तब्बल २ हजार ५२५ किलोमीटरचा प्रवास करते. सांडपाणी, मैला आणि उद्योगांमधून सोडण्यात आलेले रसायनयुक्त पाणी यामुळे मुख्यत्वे गंगा नदी प्रदूषित झाली असून गंगा नदीच्या किनाऱ्यावर मध्यम आणि मोठी शहरे मोठय़ा प्रमाणावर वसलेली आहेत.

new water purification project, water purification Bhandup Complex, Mumbai,
मुंबई : भांडूप संकुलातील नव्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामला सुरुवात, जुन्या प्रकल्पाचे आयुर्मान संपुष्टात
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Waldhuni River, Pollution, Ambernath
वालधुनीचे प्रदुषण रोखण्यासाठी प्रकल्प आराखडा, प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून निविदा मागिवली
state government approved appointment of contractors for construction of 2175 houses in Patrachal
मुंबई : पत्राचाळीतील २,१७५ घरांच्या बांधकामाचा मार्ग मोकळा
IIT will take help to prevent suicides from Atal Setu Mumbai print news
अटल सेतूवरून होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी आयआयटीची घेणार; ‘एमएमआरडीए’ लवकरच तज्ज्ञांची समिती स्थापन करणार
Objection notice submitted by consumer panchayat on housing policy regarding ownership of Zopu plot Mumbai news
झोपु भूखंडाची मालकी विकासकांना देण्यास विरोध! गृहनिर्माण धोरणावर ग्राहक पंचायतीकडून हरकती-सूचना सादर
maharashtra new housing policy to benefit builders
विश्लेषण : राज्याचे गृहनिर्माण धोरण विकासकांच्या फायद्यासाठीच?
BJP Navi Mumbai, Navi Mumbai Eknath Shinde,
नवी मुंबईत शिंदे समर्थकांच्या अभियानामुळे भाजपमध्ये अस्वस्थता