अहमदाबाद : गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. राज्य आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार बलसाड आणि नवसारी जिल्ह्यांतील काही भागांत रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत अत्यंत मुसळधार पाऊस झाला. पावसाशी संबंधित दुर्घटनांत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक गावे जलमय झाल्याने व रस्ते पाण्याखाली गेल्याने तेथील संपर्क तुटला आहे. येथे अडकलेल्या पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून (एसडीआरएफ) दिवस-रात्र मदतकार्य सुरू माहिती त्यांनी दिली. सध्या जामनगर हा सर्वात जास्त प्रभावित जिल्ह्यांपैकी एक आहे. पोलिसांनी सांगितले, की शुक्रवारपासून पावसाशी संबंधित दुर्घटनांत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात सरासरी ३२ मिमी पाऊस झाला.

food delivery man knife attack, Mumbai,
मुंबई : अंगावर पाणी उडाल्याने अन्नपदार्थ घरी पोहोचविणाऱ्याने केला चाकू हल्ला
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Father and son imprisonment, imprisonment beat police,
मुंबई : कर्तव्या बजावणाऱ्या पोलिसांना मारहाण करणे महागात, पिता-पुत्राला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा
Bihar hooch Tragedy
Bihar Hooch Tragedy : दारूबंदी असलेल्या राज्यात विषारी दारूमुळे मृत्यूचं तांडव, घराघरांत मृतदेह, अनेकांनी दृष्टी गमावली; बिहारमध्ये नेमकं काय घडलं?
Gang rape in Bopdev Ghat triggers safety concerns
असुरक्षित टेकड्या; भयभीत पुणेकर
Lakadganj police station is in discussion due to the controversial affairs
नागपूर : गंगाजमुनातील वारांगना; पोलिसांचा छापा अन् ग्राहकांची पळापळ…
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…
Deonar Pada cemetery, Deonar Pada cemetery lights,
मुंबई : देवनार पाडा स्मशानभूमी अंधारात, विजेचे दिवे बंद असल्याने नागरीकांना मनस्ताप

अमित शहांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, गुजरात सरकार मुसळधार पावसाचा फटका बसलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शाह यांनी ‘ट्वीट’ केले. की गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती झाली आहे. पूरबाधितांना सुरक्षितस्थळी हलवणे, त्यांना आश्रय, अन्नधान्य पुरवठय़ासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी बोलून परिस्थिती जाणून घेतली. केंद्र व राज्य आपत्ती व्यवस्थापन पथके व स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून हे मदतकार्य सुरू आहे. या कठीण प्रसंगी केंद्र व राज्यसरकार गुजरातवासीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे.