पीटीआय, अमरावती

तेलंगण, आंध्र प्रदेश या राज्यांत गेल्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून त्याचा फटका ४.५ लाख नागरिकांना बसला आहे. राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने मदतकार्यास सुरुवात केली असून ३१,२३८ जणांना १६६ मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. पावसामुळे दोन्ही राज्यांमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

RG Kar Medical College and Hospital Principal Dr Sandeep Ghosh arrested by CBI on charges of financial irregularities
‘आर. जी. कर’च्या माजी प्राचार्यांना अटक
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Central government notice to Netflix after controversy over IC814 web series
‘नेटफ्लिक्स’ला केंद्र सरकारची नोटीस; ‘आयसी८१४’वेबमालिकेवरून वादानंतर कारवाई
Enforcement Directorate arrested Aam Aadmi Party MLA Amanullah Khan in financial misappropriation case
आम आदमी पक्षाच्या आमदाराला अटक
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
prakash ambedkar reaction on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावरून प्रकाश आंबडेकरांची टीका; म्हणाले, “भाजपा-आरएसएसला आजही…”
kangana Ranaut is disappointed after the film Emergency did not get Censor Board certification
हतोत्साहित करणारे, अन्यायकारक! ‘इमर्जन्सी’ला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे कंगना राणावत निराश
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…

विजयवाडा, गुंटूर, कृष्णा, एलुरु, पायनाडू, बापटला आणि प्रकाशम या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या २० आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या १९ तुकड्या बचावकार्यात गुंतल्या आहेत. गुंटूर आणि एनटीआर जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनुसार भारतीय नौदलाने आपत्तीग्रस्त भागात शोध आणि बचावकार्यासाठी दोन हेलिकॉप्टर तैनात करण्याचे मान्य केले; त्यापैकी एक आधीच विजयवाडा येथे आले आहे, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले. पुराचा सर्वाधिक फटका विजयवाडा जिल्ह्याला बसला असून तिथे दुधासह जीवनावश्यक वस्तूंसाठी रहिवाशांना संघर्ष करावा लागत आहे.

हेही वाचा >>>Karsen Kitchen : अंतराळात जाणारी सर्वांत तरुण महिला; २१ व्या वर्षी इतिहास रचणारी कार्सेन किचन कोण?

तेलंगण सरकारची केंद्राकडे मदतीची मागणी

तेलंगणमध्ये पावसामुळे सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले. या राज्यांमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला. केंद्र सरकारने तातडीने दोन हजार कोटी रुपयांची मदत करावी, अशी मागणी राज्य सरकारने केली. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूरग्रस्त भागाचा दौरा करून पूर ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याचे आवाहन केले.

दक्षिण मध्य रेल्वेला फटका

सिकंदराबाद मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य रेल्वेला पावसाचा मोठा फटका बसला. रुळांवर पाणी साचल्याने तब्बल ४३२ गाड्या रद्द करण्यात आल्या आणि १३ गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या. सोमवारी दुपारपर्यंत १३९ गाड्या वळवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. काझीपेठ-विजयवाडा विभागात पूर आणि दरड कोसळल्या आणि पाच गाड्या अडकून पडल्या.