सध्या देशभरात अनेक ठिकाणी भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडत आहेत. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भाज्यांच्या दरवाढीसाठी मियां (मुस्लीम) व्यापारी जबाबदार आहेत, असं विधान केलं आहे. सरमा यांना आसाममधील भाज्यांच्या वाढत्या दराबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. गुवाहाटीमध्ये भाज्या इतक्या महाग का आहेत? असा प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री सरमा म्हणाले, “हे मियां व्यापारी आहेत, जे चढ्या भावाने भाजीपाला विकत आहेत.”

‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार, “आसाममध्ये बंगाली वंशाच्या मुस्लिमांसाठी ‘मियां’ हा शब्द वापरला जातो. आसाममध्ये बंगाली वंशाच्या मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात असून ते प्रामुख्याने भाजीपाला आणि मासे विक्रीचा व्यवसाय करतात. अशा स्थितीत सध्या आसाममध्ये भाज्यांचे भाव प्रचंड वाढले आहेत.” त्यामुळे आसाम सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. भाज्यांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे.

anjali damania on dhananjay Munde
Dhananjay Munde : अंजली दमानियांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे आक्रमक, एक्स पोस्टद्वारे इशारा; म्हणाले, “मोघम आरोप करणाऱ्या…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
congress state president nana patole calls mahayuti government corrupt
महायुतीचे सरकार भ्रष्ट, तीन पक्षांत मलई खाण्याची स्पर्धा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघात
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
veteran actor amol palekar remark in jaipur literature festival 2025
जयपूर साहित्य महोत्सव :सध्या सरकारविरोधात जो बोलतो तो देशद्रोही; अमोल पालेकर यांचे परखड मत
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान

ओवेसी काय म्हणाले?

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या या विधानानंतर एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्यावर कठोर टीका केली आहे. “भारतात असा एक गट आहे जो त्यांच्या घरातील म्हशीने दूध नाही दिलं, कोंबडीने अंडी नाही घातली तरी ते मुस्लिम समाजाला दोष देतील. कदाचित ते त्यांच्यातील वैयक्तिक दोषाचेही खापर मिया बंधूंवर टाकतील. आजकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातील मुस्लिम नेत्यांची भेट घेत आहेत. त्यांच्यासोबत घट्ट मैत्री करत आहेत.”

“मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा दोन समुदायांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत”, असा हल्लाबोल ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी केला आहे. बारपेटा येथील काँग्रेस खासदार अब्दुल खलेक यांनीही सरमा यांच्यावर सांप्रदायिक/जातीय दंगली घडवण्यासाठी लोकांना सतत चिथावणी दिल्याचा आरोप केला आहे.

Story img Loader