काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची ‘भारत न्याय जोडो यात्रा’ आसाममध्ये आहे. आज ( २२ जानेवारी ) राहुल गांधी नागाव जिल्ह्यातील संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थळी बाटाद्राव थान येथे जाणार होते. पण, राहुल गांधींना श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थळी जाण्यापासून रोखण्यात आलं. यानंतर मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमा यांनी ट्वीट करत राहुल गांधींना डिवचलं आहे.

राहुल गांधींचा ताफा नागाव येथे पोलिसांकडून रोखण्यात आला. यानंतर राहुल गांधींनी कार्यकर्त्यांसह धरणं आंदोलन केलं. स्थानिक खासदार, आमदार वगळता अन्य कुठल्याही काँग्रेस नेत्याला मंदिराच्या दर्शनासाठी परवानगी देण्यात आली नाही. यावेळी राहुल गांधींनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्याला प्रश्नांचा भडीमार केला.

नामदेव महाराज शास्त्री हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील भगवानगडाचे महंत आहेत. (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Namdev Shastri Kirtan : कोण आहेत भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री? त्यांच्या कीर्तनास विरोध का होत आहे?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Rahul Gandhi on Maharashtra election result
राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका
Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “७० लाख मतदार अचानक…”, राहुल गांधींचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत गंभीर आरोप
loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?
Congress leader Ravindra Dhangekar
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेच्या वाटेवर ?

“मला फक्त एक सांगा माझी चूक काय? मला मंदिरात जाण्यापासून का रोखलं जात आहे? आम्ही कुठलाही नियम मोडलेला नाही. मला मंदिरातून निमंत्रण मिळालं आहे. आम्हाला मंदिरात जायचं आहे. तरीही का रोखण्यात येत आहे?” असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला.

या घटनेनंतर हिंमता बिस्व सरमांनी ‘एक्स’ अकाउंटवर दोन वाक्यांत ट्वीट केलं आहे. “राम राज्य”, असं लिहित हिंमत बिस्व सरमांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.

यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “२२ जानेवारीला आम्ही मंदिरात सकाळी ७ वाजता जाणार होतो. पण, अचानक आम्हाला ३ वाजेपर्यंत तेथे येऊ शकत नाही, असं सांगण्यात आलं. राज्य सरकारकडून दबाव टाकण्यात येत आहे,” असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.

Story img Loader