अरूणाचल प्रदेशमधली राष्ट्रपती राजवट रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले. त्यानंतर देशभरातील राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. सर्वोच्च न्यालयाच्या या निर्णयानंतर तरी मोदीजी लोकाशाहीचा आदर करतील असा टोला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लगावला आहे. मोदींना संविधान आणि जनादेश या दोन्ही गोष्टींवर विश्वास नाही. त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे हा देश चालवायचा आहे असाही आरोप केजरीवालांनी केलाय. आधी उत्तराखंड आणि आता अरूणाचल प्रदेश अशा दोन्ही ठिकाणीची राष्ट्रपती राजवट रद्द करून न्यायालयानं मोदी सरकारला दोनदा चपराक लगावली आहे, त्यामुळे या प्रकरणातून धडा घेऊन मोदीजी आतातरी दिल्ली सरकारला त्यांच्या मार्गाने काम करू देतील अशी प्रतिक्रियाही केजरीवाल यांनी दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा