आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतं आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपल्या प्रतिक्रियेत त्यांनी नारीशक्तीचा गौरव केला. तसंच विरोधकांनी मागच्या दहा वर्षांमधून धडा घ्यावा आणि आता तरी हलकल्लोळ आणि गोंधळ घालू नये असंही आवाहन त्यांनी केलं.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

“संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं मार्गदर्शन लाभणार आहेत. तसंच गुरुवारी निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प पटलावर ठेवण्यात येईल. नारीशक्तीच्या साक्षात्काराचं हे पर्व आहे. मी आशा करतो की मागच्या दहा वर्षात ज्यांना ज्या मार्गाने जायचं होतं त्या मार्गाने संसदेत प्रत्येकाने कार्य केलं. आज मी हे सांगू इच्छितो की ज्यांना दंगा घालण्याची सवयच झाली आहे, जे धुडगूस घालून लोकशाही मूल्यांचं वस्त्रहरण करतात अशा खासदारांनी शेवटच्या सत्रात आत्मपरिक्षण करावं.” असंही मोदी यांनी महटलं आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
NCPs MLA from Wai Makarand Jadhav appointed as Guardian Minister of Buldhana
बुलढाणा पालकमंत्री निवडीतही धक्कातंत्र; राष्ट्रवादीची बाजी
MLA Rohit Pawar On NCP Sharad Pawar
Rohit Pawar : शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्या पक्षात फेरबदल…”

चांगले मुद्दे तिखट स्वरात मांडले तरीही स्मरणात ठेवले जातात

विरोधाचा स्वर तिखट असला, आमच्यावर कितीही टीका झाली तरीही विरोधकांनी जर चांगले आणि योग्य मुद्दे मांडले तर, आपल्या बोलण्यातून ज्यांनी चांगले विचार ठेवले त्यांना लोक स्मरणात ठेवतात. आमच्या विरोधात तिखट प्रतिक्रिया दिली असेल तरीही देशातला एक मोठा वर्ग लोकशाहीच्या या मार्गाने केलेल्या टीकेचंही स्वागत करतो. मात्र ज्यांनी लोकशाहीची मूल्यं बाजूला सारणं, तसंच गोंधळ घालणं ज्यांचा स्वभाव आहे त्यांनी माफी मागण्याची वेळ आली आहे. तसंच गोंधळ घालणाऱ्या खासदारांनी जरा आत्मपरीक्षण करावं असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की निवडणूक जवळ आली असेल तर पूर्ण बजेट सादर होत नाही. फक्त अंतरिम बजेट सादर होतं. आम्हीही ती परंपरा कायम ठेवू असंही मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावतो आहे. जनतेच्या आशीर्वादाने तो आणखी उंचावेल असा मला विश्वास आहे असंही मोदी यांनी म्हटलं आहे.

Story img Loader