लोकसभा निवडणूक सुरू होऊन आता महिनाभराचा कालावधी होत आला आहे. आणखी १५ दिवसांनी शेवटचा टप्पा पार पडेल. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या टप्प्यापासूनच प्रत्येक वळणावर निवडणुकीतील विषय बदलत गेले. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात भाजपा आणि मोदींनी “अब की बार ४०० पार”चा नारा दिला. नंतर मात्र त्याचा उल्लेख टाळला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संविधान बदलाच्या चर्चांमुळे हा नारा सोडला. तसेच भाजपाने २०४७ पर्यंत विकसित भारताची संकल्पना मांडली. पण, एवढ्या लांबचा धीर मतदारांमध्ये नसल्याचे पाहून ही घोषणाही मागे पडली. दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदींनी थेट मुस्लीम समाजाला लक्ष्य केले, असे विरोधकांचे म्हणणे आहे. राजस्थानमधील प्रचारसभेत बोलताना मोदींनी मुस्लिमांना घुसखोर संबोधले. तसेच काँग्रेसचे सरकार आल्यानंतर हिंदू महिलांचे मंगळसूत्र काढून घेतले जाईल आणि अधिक मुले असणाऱ्यांना दिले जाईल, असेही ते म्हणाले. निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मात्र मी मुस्लिमांच्या घरात वाढलो, एकत्र ईद साजरी केली, असे म्हणण्यापर्यंत परिस्थिती कशी बदलत गेली याचा घेतलेला हा आढावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा