उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये भोलेबाबांचा सत्संग आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी सत्संग झाल्यानंतर जेव्हा भोलेबाबा निघाले तेव्हा चेंगराचेंगरी झाली. १२१ भाविकांचा यात मृत्यू झाला. या प्रकरणात कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर व इतरांची नावे यामध्ये आहेत.

२ जुलैच्या दिवशी नेमकं काय घडलं?

२ जुलैच्या दिवशी उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये स्थानिक धर्मोपदेशक नारायण साकार विश्व हरी उर्फ ​​भोलेबाबा यांनी आयोजित केलेल्या सत्संगाच्या वेळी ही चेंगराचेंगरी झाली. “या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा हजारो लोक आले होते. भोले बाबांनी सत्संगस्थळ सोडल्यानंतर त्यांचा स्पर्श झालेली माती गोळा करण्याकरता गर्दी जमली. त्यासाठी लोक जमिनीवर पसरले होते. यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत भाविक जवळच्या नाल्यात पडले, या घटनेत १२१ जणांचा मृत्यू झाला.” ही माहिती पोलिसांनी दिली आहे.

BJP Navi Mumbai, Navi Mumbai Eknath Shinde,
नवी मुंबईत शिंदे समर्थकांच्या अभियानामुळे भाजपमध्ये अस्वस्थता
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Case against five persons including owner in case of accident in glass factory
काच कारखान्यातील दुर्घटनेप्रकरणी मालकासह पाचजणांविरुद्ध गुन्हा, येवलेवाडीतील दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू
Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
ujjwal nikam on akshay shinde encounter
“या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी नक्कीच होईल, कारण…”; अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी उज्वल निकम यांची प्रतिक्रिया!
Thousands protested in Gondia on September 22 against attacks on women in Bangladesh
गोंदिया : हातात फलक, डोळ्यात राग; बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जनआक्रोश…
loksatta analysis two kids die in gadchiroli due to superstition
विश्लेषण : गडचिरोलीतील दोन भावंडांच्या मृत्यूची चर्चा का? अंधश्रद्धेमुळे मृत्यू झाल्याचा संशय?
Manipur Curfew
Curfew  in Manipur : आता घराबाहेर पडण्यासही मनाई; मणिपूरमध्ये नेमकी परिस्थिती काय?

हे पण वाचा- हाथरस चेंगराचेंगरी; राहुल गांधींनी पीडित कुटुंबीयांची घेतली भेट | Rahul Gandhi | Hathras

भोलेबाबांनी आता काय म्हटलं आहे?

“२ जुलैला जी घटना घडली त्यानंतर मी खूप व्यथित झालो आहे. देव आम्हाला या धक्क्यातून सावरण्याची शक्ती देओ, आम्हाला प्रशासन आणि शासनावर विश्वास आहे. जे समाजकंटक आहेत त्यांना शिक्षा होईल, कुणालाही सरकार सोडणार नाही. आमचे वकील डॉक्टर ए.पी. सिंग यांच्या माध्यमातून कमिटीच्या माध्यमातून या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहोत. तसंच सगळ्या महापुरुषांना मी विनंती केली आहे की या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबांना आपल्याला साथ द्यायची आहे. सर्वतोपरी सहकार्य करायचं आहे. माझी विनंती सगळ्यांनीच मान्य केली आहे. देव सगळ्यांना सद्बुद्धी देईल. जी घटना घडली त्याचं मला अतीव दुःख झालं आहे. माझ्या संवेदना मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसह कायम आहेत, तसंच जे जखमी झाले त्यांनाही आराम पडावा अशी मी प्रार्थना करतो.”

चेंगराचेंगरीच्या आधी काय घडलं?

“भोलेबाबा हे स्टेजवरच्या आसनावर बसून बोलत होते. त्यांना पाहण्यासाठी काही महिला खांबावर चढल्या होत्या. महिला, पुरुष आणि लहान मुलं मांडवात उभे राहिले होते आणि भोले बाबांचा जयजयकार करत होते. भोलेबाबांना पाहण्यासाठी ही सगळी गर्दी झाली. याच सगळ्या गडबडीनंतर चेंगराचेंगरीची घटना घडली.” प्रमाणापेक्षा जास्त लोक आल्याने ही घटना घडली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेत जे जखमी झाले आहेत त्यांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. तसंच मृतांच्या नातेवाईंना मदत जाहीर करण्यात आली आहे.एका महिलेने ही माहिती दिली