उदयपूर सभेमध्ये बोलताना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेतृत्वातील ‘युपीए’ सरकारकडे आता फक्त २०० दिवसच शिल्लक राहिले असल्याचे म्हटले आहे.
“शहजादा राजस्थानमध्ये आला पण तो काय बोलला, कुणासाठी बोलला हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाच कळले नाही,” असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली.
वाढलेली महागाई, कांद्याचे वाढलेले भाव यामुद्द्यांवरून मोदी यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. राहुल गांधी यांचा वारंवार ‘शहजादा’ असा उल्लेख करत मोदी यांनी केंद्र सरकार ‘सीबीआय’चा दुरूपयोग करत असल्याची टीका केली.
आणखी वाचा