संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानने भारतावर पुन्हा एकदा विनाधार आरोप केले. यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं. भारताचे स्थायी मिशन प्रतिनिधी प्रतिक माधूर यांनी सर्वांसमोर पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं आणि दहशतवाद्यांना आक्षय देत असल्याचं सुनावलं.

प्रतिक माथूर म्हणाले, “भारताने यावेळी पाकिस्तानच्या चिथावणीखोर आरोपांना प्रत्युत्तर न देण्याचं ठरवलं आहे. पाकिस्तानने आम्ही संयुक्त राष्ट्रात त्यांना दिलेली आधीची उत्तरं (राईट टू रिप्लाय) पाहावीत. पाकिस्तान स्वतः दहशतवादाला खतपाणी घालतंय, दहशतवाद्यांना आश्रय देतंय. त्यांनी त्यांचा हा इतिहास पाहावा.”

Kashmir Terror Attack
Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला, माजी सैनिक ठार, पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
Sambhal violence
Sambhal Violence : पाकिस्तानी मौलवीबरोबरचा Video कॉल व्हायरल, एकाला अटक; दोघांमध्ये नेमकं बोलणं काय झालं?
Image Of Saif Ali Khan
Saif Ali Khan Attack : “गरज पडली तर पोलीस…”, सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”
US to extradite Pakistani terrorist Tahawwur Rana to India
२६/११ चा पाकिस्तानी दहशतवादी तहव्वूर राणाला अमेरिका भारतात पाठवणार… मुंबई हल्ल्यात नेमका सहभाग काय?
Jitendra Awhad on Badlapur case akshay shinde
“अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही”, बदलापूर प्रकरणातील आरोपीबाबत जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा!

“दोन दिवस आपण केलेल्या चर्चेत संघर्ष आणि मतभेद सोडवण्यासाठी शांतता हाच एकमेव मार्ग आहे यावर आपल्या सर्वांचं एकमत झालेलं असताना पाकिस्तानने विनाकारण अशी चिथावणी देणे खेदजनक आणि चुकीचे आहे,”असंही प्रतीक माथूर यांनी नमूद केलं.

हेही वाचा : “ज्या देशाचा मूळ उद्योग हा केवळ दहशतवाद असेल…”; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं!

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवादावर केलेल्या वक्तव्यानंतर पाकिस्तानने आरोप केले होते. त्यावर प्रतिक माथूर यांनी ही प्रतिक्रिया दिली. जयशंकर म्हणाले होते, “भारत आणि पाकिस्‍तानमध्ये असलेल्या मुलभूत मतभेदांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. दहशतवादाला खतपाणी घालणारा देश कधीही समृद्ध होऊ शकत नाही.”

Story img Loader