भारताकडे आज डबल एआयची शक्ती आहे. एक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि दुसरं म्हणजे अॅस्पिरेशनल इंडिया. खरं तर भारतासाठी एआय हे केवळ तंत्रज्ञान नाही, तरुणांच्या प्रगतीसाठी मोठी संधी आहे, असं मत पंतप्रधान मोदी यांनी मांडलं आहे. तसेच तंत्रज्ञान हे कुणावर नियंत्रण मिळवण्याचं किंवा विभाजन करण्याचं नाही, तर पारदर्शकता आणि सक्षमीकरणाचे साधन आहे, असेही ते म्हणाले. दिल्लीत झालेल्या एनडीटीव्ही वर्ल्ड समिटला संबोधित करताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं.

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

“भारताकडे आज डबल एआयची शक्ती आहे. एक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि दुसरं म्हणजे अॅस्पिरेशनल इंडिया. खरं तर एआय हे केवळ तंत्रज्ञान नाही, तरुणांच्या प्रगतीसाठी मोठी संधी आहे. भारताने तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करून जगाला डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा नवा मार्ग दाखवला आहे”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली.

environment protection from debris
फेनम स्टोरी: भंगारातून पर्यावरण रक्षण
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
israel anti missile system
विश्लेषण: इस्रायलप्रमाणे भारताकडेही परिणामकारक क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा आहे का?
loksatta kutuhal artificial intelligence technology recognizing human handwriting
कुतूहल : हस्ताक्षर ओळखणारे तंत्रज्ञान
Loksatta Chatura Can biological mother name be added instead of step mothes on the record
सावत्र आईऐवजी जैविक आईचे नाव लावणे हा मुलीचा अधिकारच!
Supreme Court Questions on Baijuj Case Verdict print eco news
बैजूज प्रकरणाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाचे प्रश्न
akshay shinde encounter
आरोपी मेल्याचे दु:ख नाही, पण…
tax clearance certificate required for export
देशाटनासाठी कर मंजुरी प्रमाणपत्र आवश्यक?

हेही वाचा – Nawaz Sharif : “मोदी SCO परिषदेसाठी पाकिस्तानला आले असते तर…”, नवाझ शरीफ यांची साद; देशातील गंभीर परिस्थितीचा उल्लेख करत म्हणाले…

“भारत कोणालाही गृहीत धरून नातं निर्माण करत नाही”

“डिजिटल इनोव्हेशन आणि लोकशाही मूल्ये एकत्र राहू शकतात, हे भारताने जगाला दाखवून दिलं आहे. तंत्रज्ञान कुणावर नियंत्रण मिळवण्याचे किंवा विभाजन करण्याचं नाही, तर पारदर्शकता आणि सक्षमीकरणाचे साधन आहे. भारत कोणालाही गृहीत धरून नातं निर्माण करत नाही. आमचे नातं हे विश्वासावर आधारित आहे. जगालाही आता ही गोष्ट समजली आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Salman Khan on Baba Siddique: पंतप्रधान मोदी यांच्यासमोर सलमान खाननं घेतलं होतं बाबा सिद्दीकींचं नाव; म्हणाला, “माझं मतदान…”

“१४० कोटी जनतेने देशाच्या विकासाचा संकल्प केला आहे”

पुढे बोलताना, “भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. या तरुणांमध्ये असलेली क्षमता देशाला नव्या उंचीवर नेऊ शकते. भारत आज एक उदयोन्मुख शक्ती आहे. आज देशापुढे गरिबीचं मोठं आव्हान आहे. मात्र, या आव्हानांचा सामना कसा करायचा, हेदेखील आपल्याला माहिती आहे. देशाच्या १४० कोटी जनतेने देशाच्या विकासाचा संकल्प केला आहे. आज जनता सरकार चालवत आहेत. ही लोकसहभागाची एक मोठी चळवळ बनली आहे”, असेही त्यांनी नमूद केलं.