लोकसत्ता प्रतिनिधी, नागपूर

भारताने २००१ ते २०२२ या कालावधीत आगीमुळे तब्बल ३.५९ लाख हेक्टर वृक्ष आच्छादन गमावले आणि इतर सर्व नुकसानीमुळे २.१५ दशलक्ष हेक्टर नुकसान झाले. या २१ वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक नुकसान २००८ साली झाले. कारण, यात तीन हजार हेक्टर वृक्ष आच्छादनाचे नुकसान आगीमुळे झाले, भारतीय वनसर्वेक्षण अहवालातूनच ही माहिती समोर आली आहे.

592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
uran Kandalvan forest latest news in marathi
कांदळवनाची सुरक्षा धोक्यात, उरणमधील कांदळवने विविध मार्गांनी नष्ट करण्याचे प्रयत्न
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
सोलापुरात ६२०.८० कोटींपैकी दहा महिन्यांत केवळ २३३.४५ कोटी खर्च; विकास आराखड्याला मर्यादा, निवडणूक आचारसंहितेचाही फटका
unicef report observed that education of more than 54 7 million students has affected due to heat waves in India
उष्णतेच्या लाटांचा शिक्षणाला फटका; भारतातील ५ कोटी ४७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित
Mumbai sludge disposed in kandalvan
मुंबई : नाल्यातील गाळ कचराभूमीऐवजी कांदळवनात
forest lands latest news in marathi
वनहक्क जमिनी दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने धनदांडग्यांच्या घशात

भारतात फेब्रुवारीच्या मध्यात जंगलांना वणवे लागतात, या वणव्यांचा सरासरी कालावधी सुमारे १४ आठवडे असतो. मात्र, २२ ऑगस्ट २०२२ आणि २८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत १४ हजार ६८९ वेळा ‘फायर अ‍ॅलर्ट’ मिळाला. जंगलाच्या आगीत मोठय़ा प्रमाणात हवामान संकटामुळे वाढ होते. जंगलातील आगीची तीव्रता वाढत आहे आणि २० वर्षांपूर्वीच्या तुलनेत जागतिक स्तरावर जवळपास दुप्पट वृक्ष आच्छादन जळत आहे. उष्ण कटिबंधातील आगीमुळे वृक्ष आच्छादनाचे नुकसान होत आहे आणि त्याचा परिणाम कार्बन उत्सर्जनावर होत आहे.

हेही वाचा >>>चंद्राच्या पृष्ठभागावर लाल-निळा रंग कसला? ‘प्रज्ञान’ने टिपलेल्या ‘विक्रम’च्या फोटोत काय आहे खास?

रशिया, कॅनडा, अमेरिका, फिनलंड, नॉर्वे, चीन आणि जपानमधील मोठय़ा जंगलांना व्यापणारी उष्णकटिबंधीय जंगले आणि त्यानंतर अ‍ॅमेझॉनसारखे जैवविविधतेची प्रमुख आणि आग्नेय-आशिया आणि भारतातील वर्षांवनांचा समावेश असलेल्या उष्णकटिबंधीय जंगलांवर सर्वात वाईट परिणाम झाला आहे. उष्ण कटिबंधातील आगीमुळे वृक्ष कव्हरचे वाढते नुकसान जास्त कार्बन उत्सर्जनास कारणीभूत ठरत आहे. नोव्हेंबर २०२१ ते जून २०२२ दरम्यान भारतातील जंगलात दोन लाख २३ हजार ३३३ वेळा आग लागली. तर नोव्हेंबर २०२२ ते जून २०२३ दरम्यान दोन लाख १२ हजार २४९ वेळा आग लागली अशी माहिती या वनसर्वेक्षण अहवालात देण्यात आली आहे.

Story img Loader