काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान या देशांतील चर्चेचा कणा असून सध्या उभय देशांमध्ये संबंध सुधारण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू असले तरी भारताचा प्रतिसाद निराशाजनक असल्याचे नवाज शरीफ यांनी सांगितले. ते बुधवारी वॉशिंग्टन येथे बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थित पाकिस्तानी जनसमुदायाला संबोधित केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांमध्ये नवी दिल्लीकडून निराशाजनक प्रतिसाद मिळत आहे. काश्मीर हा उभय देशांतील चर्चेत महत्त्वाचा मुद्दा असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. नवाज शरीफ हे चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून ते २२ ऑक्टोबर रोजी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा