पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी बॉलीवुड अभिनेता शाहरूख खानच्या विधानावरून उठलेल्या वादळामध्ये उडी घेत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, भारत सरकारने शाहरूखला सुरक्षा पुरवायला हवी.
मलिक म्हणाले की, शाहरुख जन्माने भारतीय आहे आणि त्याला नेहमीच भारतीय राहणे आवडेल. मात्र, भारत सरकारला विनंती आहे की त्याला सुरक्षा पुरवण्यात यावी. मी सर्व भारतीय नागरिकांना आग्रह करतो की शाहरुखच्या बाबतीत जे नकारात्मक पध्दतीने बोलत आहेत, त्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे तो एक अभिनेता आहे.
शाहरुखवर पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांमधील नागरिक प्रेम करतात, असं सांगत मलिक म्हणाले की, ‘‘मला खात्री आहे की जे कोणी त्याच्या विरोधात बोलत आहेत किंवा धमकी देण्याचा प्रयत्न करत आहेत ते आपली धमकी परत घेतील. कलाकाराला सर्वांकडून प्रेम मिळते. कलाकार प्रेम वाटतात आणि ते एकतेचे प्रतीक आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2013 रोजी प्रकाशित
भारत सरकारने शाहरूख खानला सुरक्षा पुरवावी – पाक गृहमंत्री रहमान मलिक
पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी बॉलीवुड अभिनेता शाहरूख खानच्या विधानावरून उठलेल्या वादळामध्ये उडी घेत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, भारत सरकारने शाहरूखला सुरक्षा पुरवायला हवी.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 29-01-2013 at 11:23 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India should provide security to shah rukh khan paks rehman malik