नवीन वर्षाच्या दिवशी गलवान खोऱ्यात चीनचा ध्वज फडकवल्याच्या दाव्याला भारतीय लष्कराच्या जवानांनी पूर्णविराम दिला. काही दिवसांपूर्वी चिनी सैनिकांनी या प्रदेशात त्यांचा ध्वज प्रदर्शित केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता त्याच ठिकाणी उभं राहून भारतीय जवानांनी तिथं तिरंगा फडकवला आहे. त्यामुळे आता चीनचे दावे फोल ठरले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तत्पूर्वी, मीडियाने वृत्त दिले की चीन सरकारने नवीन सीमा कायदा लागू करण्याच्या दोन दिवस अगोदर आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशातील १५ ठिकाणांचे नामांतर करण्याचा प्रयत्न केला होता. भारत सरकारने गेल्या गुरुवारी सांगितले की, चीनने अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे स्वतःच्या भाषेत बदलण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या पाहिल्या आहेत आणि असे ठामपणे सांगितले आहे की सीमावर्ती राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहील आणि नवी नावं दिल्यानं वस्तुस्थिती बदलत नाही.

चीनने अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची स्वतःच्या भाषेत नावे बदलल्याच्या वृत्तावरील माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की चीनने एप्रिल २०१७ मध्ये अशी नावे देण्याचा प्रयत्न केला होता. २०२० मधील गलवान चकमकीनंतर, लष्करी आणि राजनैतिक चर्चेच्या अनेक फेऱ्या ठप्प झाल्या आहेत.

कडाक्याच्या हिवाळ्यातही पूर्व लडाखच्या प्रत्येक बाजूला सैन्याची मोठी उभारणी हे सूचित करते की संघर्ष कमी होण्याची शक्यता नाही. भारताने असे म्हटले आहे की प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) स्थिती चीनच्या बाजूने स्थिती बदलण्याच्या एकतर्फी प्रयत्नांमुळे आणि द्विपक्षीय करारांचे उल्लंघन केल्यामुळे उद्भवली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian army unfurls tricolour in galwan valley slammed china vsk