खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमळे कॅनडा आणि भारतामधील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच, भारताने दिल्लीतील ४१ कॅनडाच्या अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश दिल्याने दोन्ही देशांमधील तणाव अधिक वाढला. दरम्यान, यावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर टीकाही केली आहे.

खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची या वर्षी जूनमध्ये सर्रे शहरातील एका गुरूद्वारात हत्या करण्यात आली. या हत्येनंतर कॅनडात राहणाऱ्या खालिस्तानी समर्थकांनी कॅनडा सरकारवर दबाव आणण्यास सुरुवात केली. त्यांचे म्हणणे होते की या हत्येमागे भारताचा हात आहे. यानंतर सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत येत निज्जर यांच्या हत्येचा आरोप भारतावर केला. तसेच ओटावामधील भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले. परिणामी या कृतीवर भारतानेही संताप व्यक्त करत नवी दिल्लीतील कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्यास सांगितले.

chinese telecom equipment used by pakistani terrorists
पाकिस्तानी दहशतवाद्यांकडे चीनची दूरसंचार उपकरणे
Putin thanks North Korea for support in Ukraine
अमेरिकेच्या निर्बंधांवर मात करण्यास सहकार्य; युक्रेनमधील पाठिंब्याबाबत पुतीन यांच्याकडून उत्तर कोरियाचे आभारप्रदर्शन
Benjamin Netanyahu dissolve Israel war Cabinet Benny Gantz Israeli Palestinian conflict Gaza war
नेतान्याहू यांनी आणीबाणी सरकार का विसर्जित केले? गाझा पट्टीतील युद्धावर काय परिणाम होईल?
ukrain peace declaration
युक्रेन शांतता आराखड्यावर सही करण्यास भारताचा नकार; ८० देशांच्या सहमतीनंतरही दिलं ‘हे’ कारण!
gurpatwant singh pannun
गुरुपतवंतसिंह पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी निखिल गुप्ता अमेरिकेच्या ताब्यात; प्रत्यार्पणानंतर होणार सुनावणी!
Suspected terrorist killed in Russian prison operation by security forces
रशियाच्या तुरुंगात ओलीसनाट्य; सुरक्षा दलांच्या कारवाईत संशयित दहशतवादी ठार
palestine pm letter to pm narendra modi
“मोदीजी आता तुम्हीच…”, इस्रायल-हमास युद्धादरम्यान पॅलेस्टाईनच्या पंतप्रधानांचे पत्र
Maldives pro-China President Mohamed Muizzu
मालदीवचे चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांची नवी दिल्ली भेट का महत्त्वाची? जाणून घ्या

“भारत सरकारने कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईमुळे दोन्ही देशातील लाखो लोकांचे जीवन संकटात सापडले आहे. भारत आणि कॅनडातील लाखो लोकांसाठी भारत सरकार नेहमीप्रमाणे जगणं कठीण बनवत आहे आणि ते मुत्सद्देगिरीच्या मूलभूत तत्त्वाचेही उल्लंघन ठरत आहे”, असं जस्टिन ट्रुडो म्हणाले.

हेही वाचा >> India Canada Tension: कॅनडाने ४१ अधिकाऱ्यांना माघारी बोलवत व्यक्त केला राग, “असं कृत्य कुणीही…”

“कॅनडाच्या काही राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्याने प्रवास आणि व्यापारात अडथळा निर्माण होऊ शकतो. तसंच, कॅनडामध्ये शिकणाऱ्या भारतीयांसाठीही अडचणी निर्माण होतील”, असा इशाराही ट्रुडो यांनी दिला. कॅनडामध्ये ५ टक्के भारतीय आहेत. कॅनडामध्ये भारतातील सर्वाधिक विद्यार्थी आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा इशारा महत्त्वाचा मानला जात आहे.

माजी अधिकाऱ्याचीही भारतावर टीका

कॅनडातल्या एका माजी अधिकाऱ्याने असं म्हटलं आहे की भारताने कॅनडेयिन अधिकाऱ्यांना देश सोडायला सांगणं ही काही सर्वसामान्य घटना नाही. अशी घटना मागच्या ४० ते ५० वर्षात घडली नव्हती. भारतातल्या कॅनडा येथील अधिकाऱ्यांनी देश सोडावा म्हणून १० ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र कॅनडा आणि भारत यांच्यात चर्चा सुरु होती त्यामुळे काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा होती. मात्र ही चर्चा अपयशी ठरली.