पीटीआय, नोएडा

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणात आवश्यक असेल त्याची चौकशी होईल, यात स्वयंघोषित धर्मगुरू भोलेबाबाचीही चौकशी केली जाईल, अशी स्पष्टोक्ती रविवारी उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या न्यायालयीन आयोगाचे सदस्य भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) माजी अधिकारी भावेश कुमार यांनी दिली.

Mahalakshmi Murder Case
Mahalakshmi Murder Case : महालक्ष्मीची हत्या का केली? आरोपीने आत्महत्या करण्यापूर्वी काय सांगितलं होतं? मुक्तीरंजन रायच्या आईचा धक्कादायक खुलासा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Akshays parents went to Ambernath Municipality for burial permission their application was not accepted
अक्षय शिंदेचे प्रकरण सत्ताधारी पुरस्कृत, मृत अक्षयच्या वकिलांचा आरोप
ujjwal nikam on akshay shinde encounter
“या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी नक्कीच होईल, कारण…”; अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी उज्वल निकम यांची प्रतिक्रिया!
Badlapur Crime News
Badlapur : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली
BJP MLA Munirathna Naidu
BJP MLA Munirathna Naidu : कंत्राटदाराचा छळ केल्याप्रकरणी भाजपाच्या आमदाराला अटक; कोण आहेत मुनीरत्न नायडू?
Giving judgments that government does not like enhances image of court says Justice Abhay Oak
वेळप्रसंगी सरकारला नावडते निर्णय दिल्याने न्यायालयाची प्रतिमा उंचावते : न्या. अभय ओकांचे स्पष्ट प्रतिपादन
gang abused family and vandalized vehicles with coyotes in Hadapsar
पुणे शहरात वाहनांची तोडफोड सुरूच; रागातून चाकूने वार आणि फसवणुकीच्या घटनांचीही नोंद

आयोग याप्रकरणी लवकरच नोटीस जारी करणार असून, स्थानिक नागरिक आणि साक्षीदारांना चेंगराचेंगरीशी संबंधित कोणतेही पुरावे, त्यांच्या जबाबासह देण्यास सांगितले जाईल, असे समितीचे अध्यक्ष तथा अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले.

हेही वाचा >>>ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल

चेंगराचेंगरीप्रकरणी आतापर्यंत मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकरसह नऊ जणांना अटक केली आहे. आम्हाला या प्रकरणाचा चौकशी अहवाल दोन महिन्यांत दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.

‘नुकसानभरपाई वाढवून देण्याची मागणी’

चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई वाढवून देण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच या प्रकरणात जे जबाबदार आहेत, त्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्या, अशी मागणीही त्यांनी केली आहे.