पीटीआय, नवी दिल्ली

मणिपूरमधील वांशिक हिंसाचारात मरण पावलेल्यांचे मृतदेह तेथील रुग्णालयांच्या शवागारांमध्ये पडून राहिले असून त्यांच्यावर दफनविधी किंवा दहनविधी केले जातील याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. त्यासाठी न्यायालयाने ४ डिसेंबपर्यंत मुदत दिली.

Girls, hotel room, meet friend, High Court,
मुलींनो, मित्राला भेटायला थेट हॉटेलच्या खोलीत जाऊ नका.. उच्च न्यायालयाचा सल्ला!
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
badlapur rape case marathi news
बदलापूर प्रकरणात माध्यम प्रतिनिधींचा आरोपींमध्ये समावेश; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नोटीसा आल्याने संताप
Chief Justice Dhananjay Chandrachud asserted that a three tier scheme would soon be in place for the disposal of cases
खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी लवकरच त्रिस्तरीय योजना; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन
supreme court judgement ed marathi news
आर्थिक गैरव्यवहार खटल्यांमध्येही ‘जामीन हा नियम, तुरुंगवास अपवाद’, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्वाळा
Sangli District Bank Lek Ladki Scheme for Farmers Daughters
सांगली जिल्हा बँकेची शेतकऱ्यांच्या मुलींसाठी ‘लेक लाडकी योजना’; लग्नावेळी दहा हजारांची विनापरतावा मदत
Badlapur sexual assault, Akshay Shinde Badlapur,
Badlapur sexual assault : ‘त्या’ आरोपीला न्यायालयीन कोठडी, आणखी कलमांचा समावेश, शाळेच्या अध्यक्षांसह सचिव फरार
cbi investigation into financial irregularities in r g kar medical college
आर्थिक अनियमिततेप्रकरणी ‘सीबीआय’चा तपास; कोलकाता हत्या प्रकरणात आरोपींच्या मालमत्तांचीही झडती

मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल विविध याचिका न्यायालयात दाखल आहेत. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या आणि न्या. (निवृत्त) गीता मित्तल यांच्या अध्यक्षतेखालील उच्च न्यायालयाच्या माजी महिला न्यायाधीशांच्या समितीने दाखल केलेल्या अहवालाची सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे बी पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने नोंद घेतली. त्यामध्ये शवागारांमध्ये पडून राहिलेल्या मृतदेहांच्या अवस्थेची माहिती देण्यात आली आहे.या शवागारांमधील १७५ मृतदेहांपैकी १६९ मृतदेहांची ओळख पटलेली असून सहा मृतदेह अज्ञात आहेत, असे न्यायालयाने नमूद केले. ओळख पटलेल्या १६९पैकी ८१ मृतदेहांवर नातेवाईकांनी दावा केला असून ८८ मृतदेहांवर दावा करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

हेही वाचा >>>तेलंगणमध्ये प्रचार थंडावला, पाच राज्यांमध्ये रविवारी मतमोजणी

मृतदेहांचे दफन किंवा दहन करण्यासाठी राज्य सरकारने एकूण नऊ जागा निश्चित केल्या आहेत. अधिकाऱ्यांनी त्याची माहिती मृतांच्या नातेवाईकांना द्यावी असे खंडपीठाने सांगितले. ओळख पटलेल्या आणि दावा केलेल्या मृतदेहांवर कोणत्याही अडथळय़ांविना कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात, असे न्यायालयाने सांगितले. राज्यामध्ये मे महिन्यात हिंसाचार झाला होता हे पाहता, ओळख न पटलेले किंवा दावा केलेले मृतदेह अनिश्चित काळासाठी शवागारांमध्ये ठेवणे योग्य ठरणार नाही असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.