नोटाबंदीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिजम कॉर्पोरशन (आयआरसीटीसी) ने दिलासा दिला आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ई-तिकिट आणि आय- तिकिटांच्या बुकिंगवर सेवा शूल्क (सर्व्हिस चार्ज) लागणार नाही. रोखविरहीत व्यवहारांना चालना मिळावी म्हणून आयआरसीटीसीने हे पाऊल उचलले आहे.
सध्या द्वितीय श्रेणी ई-तिकिटावर २० रूपये तर आय-तिकिटावर ८० रूपये सेवा शूल्क आकारला जातो. उच्च श्रेणीचे तिकिट बुक केल्यास ई-तिकिटावर ४० रूपये तर आय-तिकिटावर १२० रूपये सेवा शूल्क द्यावा लागतो. परंतु नव्या निर्णयामुळे येत्या ३१ डिसेंबरपर्यंत सेवा शूल्क माफ करण्यात आला आहे. त्यामुळे नियमित रेल्वे प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Story img Loader