आज (गुरुवार) सकाळी विविध भारतीय प्रसारमाध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांततेच्या नोबेल पुरस्काराचे प्रबळ दावेदार असल्याच्या बातम्या दिल्या. यासाठी प्रसारमाध्यमांनी नोबेल पुरस्कार समितीचे उपाध्यक्ष अस्ले तोजे यांच्या वक्तव्याचा हवाला दिला. पण आता अस्ले तोजे यांनी स्वत: या बातम्यांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. संबंधित बातम्या खोट्या असून नरेंद्र मोदी हे शांततेच्या नोबेल पुरस्काराचे प्रबळ दावेदार आहेत, असं आपण म्हटलो नाही, असं स्पष्टीकरण अस्ले तोजे यांनी दिलं आहे.

संबंधित बातम्या प्रसारित झाल्यानंतर ‘ANI’ ला दिलेल्या मुलाखतीत तोजे म्हणाले, ”एका खोट्या बातमीचं ट्वीट समोर आलं होतं. मला वाटतं की, आपण त्या सर्व बातम्यांना बनावट बातम्या मानलं पाहिजे. ती खोटी बातमी आहे, त्यावर आपण चर्चा करायला नको. त्यावर चर्चा करून खोट्या बातमीला हवा-पाणी द्यायला नको. संबंधित ट्विटमध्ये जे काही लिहिलं होतं, तसं मी काहीही बोललो नाही. ट्विटमधील विधान मी स्पष्टपणे नाकारतो.”

Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Rishi Sunak on Mumbai tour
ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांची मुंबईच्या मैदानात फटकेबाजी
Raj Thackeray should come to Sangamner to see why Balasaheb Thorat was defeated says MLA Amol Khatal
माजी मंत्री थोरात यांचा पराभव का झाला ते पाहण्यासाठी राज ठाकरेंनी संगमनेरात यावे – आमदार अमोल खताळ
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
mathadi workers leader narendra patil express view on ajit pawar upset
थोरल्या पवारांचे आभार, अजितदादा मात्र नाराज;माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे अनुभव कथन

अस्ले तोजे नेमके काय म्हणाले?

खरं तर, नोबेल पुरस्कार समितीचे उपाध्यक्ष अस्ले तोजे सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी विविध प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, त्यांनी रशिया-युक्रेन युद्धातील भारताच्या भूमिकेचं कौतुक केलं. नोबेल समितीचे उपाध्यक्ष अस्ले तोजे म्हणाले की, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मोदी यांनी कोणतीही धमकी न देता युद्धाच्या परिणामांबद्दल कडक संदेश दिला. आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा नेत्यांची खूप आवश्यकता आहे.”

हेही वाचा- रशिया – युक्रेन युद्धातील मोदी सरकारच्या भूमिकेचं ‘नोबेल’ समितीकडून कौतुक

रशिया-युक्रेन युद्धावेळी मोदींनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक करताना अस्ले तोजे पुढे म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा प्रकारच्या हस्तक्षेपांची गरज आहे. अण्वस्त्रे वापरण्याच्या परिणामांची रशियाला आठवण करून देण्यासाठी भारताचा हस्तक्षेप खूप महत्त्वाचा होता. मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना सांगितलं की, हे युद्धांचं युग नाही. भारताने कोणताही मोठा गाजावाजा केला नाही. तसेच कोणालाही धमकावलं नाही. भारताने केवळ मैत्रीपूर्ण रीतीने आपली भूमिका जाहीर केली. जागतिक राजकारणात आपल्याला याची आवश्यकता आहे.”

Story img Loader