राज्यातील ग्रामीण भागांमध्ये सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमधील प्रत्येक गाव एकमेकांना जोडण्याच्यादृष्टीने गावांगावांध्ये साकव (लहान पूल) उभारण्याची योजना निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील दळणवळणाची व्यवस्था बळकट होण्याच्या दृष्टीने अधिक मदत होईल. सध्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सुमारे ५०० ते ६०० पूल उभारणीसाठी सुमारे ५० लाख ते ५ कोटीपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने एक व्यापक योजना तयार करुन आर्थिक मदत देण्याची मागणी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज(बुधवार) केली. यावेळी व्यासपिठावर उपस्थित केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांनी यांसदर्भात प्रस्ताव तयार करण्याची सूचनाही याप्रसंगी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा