लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये मोठा झटका बसला आहे. येथील बडे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी, माजी खासदार गजेंद्र सिंह राजुखेडी तसेच अन्य नेत्यांनी ९ मार्च रोजी भाजपात प्रवेश केला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, मध्य प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही डी शर्मा तसेच माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

संजय शुक्ला, अर्जुन पालिया, विशाल पटेल यांचा भाजपात प्रवेश

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये संजय शुक्ला, अर्जुन पालिया, विशाल पटेल या नेत्यांचाही समावेश आहे. पचौरी हे गांधी घराण्याच्या जवळचे मानले जायचे. ते केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री होते. ते चार वेळा राज्यसभेचे खासदार राहिलेले आहेत. ते मध्य प्रदेश काँग्रेसचे मोठे आणि महत्त्वाचे नेते होते. मात्र लोकसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन थेट भाजपात प्रवेश केला आहे.

Kerala Politics
Kerala Politics : आगामी विधानसभेनंतर केरळच्या मुख्यमंत्री पदावर आययूएमएल दावा करणार? मित्रपक्ष काँग्रेसला दिला इशारा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Delhi election result updates in marathi
‘आप’ची मतपेढी फुटण्यावरच दिल्लीतील निकालाचे गणित?
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…

काँग्रेसमध्ये असताना भूषवली महत्त्वाची पदे

काँग्रेसमध्ये असताना पचौरी यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवलेली आहेत. ते मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. ते युवक काँग्रेसचेही राज्य अध्यक्ष राहिलेले आहेत. तर राजुखेडी हे आदिवासी समाजातील मोठे नेते मानले जातात. ते १९९८, १९९९ आणि २००९ अशा एकूण तीन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर धार या जागेवरून खासदार झालेले आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याआधी ते भाजपात होते. १९९० साली ते भाजपाच्या तिकिटावर आमदार झाले होते. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केलाय.

Story img Loader