केरळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलं असून वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडीमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेत १५६ जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही शेकडो लोक बेपत्ता असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तसेच जखमी झालेल्या लोकांची संख्या वाढली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या भूस्खलनाच्या दुर्घटनेत अद्यापही अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. सध्या एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य सुरु आहे. मात्र, खराब हवामान आणि पावसामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण होत आहेत.

वायनाड जिल्ह्यात झालेल्या या भूस्खलनाच्या घटनेचा तब्बल ४ पेक्षा जास्त गावांना फटका बसला आहे. जे यामध्ये अडकले आहेत, त्यांची सुटका करण्यासाठी आणि मदतीसाठी एनडीआरएफची टीम, राज्याचे आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), स्थानिक प्रशासन, पोलीस, नौदल, अग्निशमन दल आणि भारतीय लष्कराकडूनही मदतकार्य सुरु आहे. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी संवाद साधून या घटनेची माहिती घेत सर्वतोपरी मदत केंद्र सरकारकडून करण्यात येईल, असं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिलं.

Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
maharera issue model guidelines to regulate senior citizen housing projects
ज्येष्ठ नागरिकांच्या गृहनिर्माणासाठी विकासकांना चटईक्षेत्रफळात सवलत! राज्याकडून मसुदा जाहीर; हरकती-सूचनांसाठी २१ सप्टेंबरपर्यंत मुदत
mhada Reduce Consent Requirement of building owner for Group Redevelopment
समूह पुनर्विकासात इमारत मालकांच्या १०० टक्के संमतीला म्हाडाकडून आक्षेप, साडेआठशे इमारतींचा पुनर्विकास दृष्टिपथात!
tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य
gadchiroli, investigation, IAS officer Shubham Gupta
वादग्रस्त ‘आयएएस’ अधिकारी शुभम गुप्ताच्या अडचणीत वाढ, कार्यकाळातील सर्व प्रकरणांची होणार चौकशी…
Assam Muslim Marriage
Assam Muslim Marriage : मुस्लिमांना आता विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी अनिवार्य; आसाम सरकारचा मोठा निर्णय
private guards stopped tourists for taking rare bird photo at wetland near palm beach road
पाणथळ जागेवर छायाचित्रणास मज्जाव! नवी मुंबईत विकासकाच्या सुरक्षारक्षकांकडून पर्यावरणप्रेमींची अडवणूक

हेही वाचा : केरळमध्ये १२३ बळी; वायनाडमध्ये भूस्खलन, १२८ जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

वायनाडमधील भूस्खलनाच्या घटनेत मदत करण्यासाठी २०० पेक्षा जास्त लष्कराचे जवान मदतीसाठी तैनात करण्यात आले आहेत. मदतकार्यात पावसामुळे आणि रात्री अंधारामुळे अडथळा येत असल्याने रात्री सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं. मात्र, पुन्हा सकाळी मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. या भूस्खलनावेळी काहीजण नदीत वाहून गेल्याचंही सांगितलं जात आहे.

दोन दिवसांचा दुखवटा जाहीर

केरळ सरकारने वायनाडमधील भूस्खलनाच्या दुर्घटनेनंतर दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर्स मदतीसाठी पाठवण्यात आली असल्याची माहितीही देण्यात आली आहे. दरम्यान, आजही काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आल्यामुळे तेथील स्थानिक प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलेलं आहे.

दोन लाख रुपयांची मदत

वायनाड भूस्खलनाच्या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना ५० हजारांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही पंतप्रधान मोदींनी दिलं आहे.

राहुल गांधी वायनाड दौरा करणार

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे आज वायनाड दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात ते वायनाड भूस्खलनाच्या घटनेची पाहणी करण्याची शक्यता आहे. तसेच नुकसान झालेल्या ग्रामस्थांशी संवाद साधत आढावा घेणार आहेत. याबाबत राहुल गांधी यांनीही केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी चर्चा केली. तसेच तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत सर्व संस्थामधील मदत कार्यात समन्वय राखला जाईल याची काळजी घेत कोणत्याही मदतीची गरज असेल तर कळवण्यास सांगितलं असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे