अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याप्रकरणी शनिवार ( १८ मार्च ) खलिस्तानी नेता आणि वारिस पंजाब दे चा प्रमुख अमृतपाल सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अमृतपाल सिंह याच्यासह सह जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. ही कारवाई केल्यानंतर पंजाबमधील अनेक ठिकाणी इंटरनेटसेवा उद्यापर्यंत ( १९ मार्च ) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आज ( १८ मार्च ) सकाळी अमृतपाल सिंह हा त्याच्या सहकाऱ्यांसह शाहकोटजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यासाठी पंजाब पोलिसांच्या ५० गाड्या त्यांच्या मागावर होत्या. अखेर जालंदरच्या नकोदरजवळ सिंह याला साथीदारासह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यानंतर पंजाबमधील परिस्थिती चिघळू नये, यासाठी इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे.

Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? स्वतः सैफनेच पोलिसांना सांगितलं; जबाबात म्हणाला, “मी हल्लेखोराला…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Mira Road, Bangladesh nationals arrested ,
सैफ प्रकरणानंतर बांगलादेशींची धरपकड सुरू, मिरा रोडमधून ३ बांगलादेशी नागरिकांना अटक
person who came to Thane for selling whale fish vomit ambergris arrested by thane Polices Crime Investigation Branch
वारजे भागात सराईताकडून तरुणावर कोयत्याने वार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सराईत अटकेत
Saif Ali Khan attack case Diamond ring stolen by attacker while working in pub
सैफ अली खान हल्ला प्रकरण : पबमध्ये कामाला असताना हल्लेखोराकडून हिऱ्याच्या अंगठीची चोरी
Saif Ali Khan News
Saif Ali Khan : सैफवर हल्ला करुन हल्लेखोर पळाला, त्याने दादरला जाणारी ट्रेन पकडली आणि… नेमकं काय काय घडलं? वाचा घटनाक्रम
Saif ali khan, police , Saif ali khan news,
सैफच्या हल्लेखोराला पकडायला किती पोलीस कामाला?
Saif ali khan, accused who attacked Saif ali khan,
Saif Ali Khan Latest News : सैफवर हल्ला करणारा आरोपी मुंबईत नेमका कुठे वास्तव्याला?

हेही वाचा : विरोधी पक्षातील नेत्यांवरच ईडी आणि सीबीआयच्या छापेमारीचा आरोप, अमित शाहांचं सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले…

पंजाबच्या गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील काही ठिकाणांची इंटरनेट, एसएमस सेवा ( बँक आणि मोबाईल रिचार्ज वगळून ) १८ मार्च ते १९ मार्च बंद ठेवली जाणार आहे.

काय आहे प्रकरण?

पंजाबच्या रूपनगर जिल्ह्यातील वरिंदर सिंह यांनी लवप्रीत सिंह, अमृतपाल सिंह यांच्यासह ३० जणांवर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर लवप्रीतसह एकाला पोलिसांनी अटक केली होती. पण, पोलिसांनी एकास सोडून देत लवीप्रतला जेलमध्येच ठेवलं होतं.

हेही वाचा : “माझी पत्नी घरात एकटीच”, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, “पोलिसांनी घरात घुसून…”

लवप्रीतला सोडण्यासाठी अमृतपालने पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांसह जात धमकी दिली. यावेळी अमृतपालचे समर्थक आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली. यात अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले होते.

Story img Loader