Soumya Viswanathan Murder Case: २००९ मध्ये जिगिषा घोष या मुलीच्या हत्या प्रकरणात रवि कपूर, अमित शुक्ला आणि बलजीत मलिक यांना अटक केली. २००८ मध्ये झालेल्या सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणातही त्यांचा सहभाग असल्याचं त्यांनी कबूल केलं. हातावरचा एक टॅटू आणि पोलिसांकडून चोरलेला वायरलेस फोन यामुळे जिगिषा घोष प्रकरण उलगता आलं आणि सौम्या विश्वनाथनचे मारेकरी कोण आहेत? त्यांच्यापर्यंत पोलीस पोहचले. २००९ मध्ये जिगिषा घोषची हत्या करण्यात आली होती. त्यातल्या आरोपींनी सौम्या विश्वनाथनच्या हत्येचीही कबुली दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोर्टाने सगळ्या आरोपींना ठरवलं दोषी

दिल्लीतल्या साकेत न्यायालयाने सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणातल्या आरोपींना दोषी ठरवलं आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. १५ वर्षांपूर्वी पत्रकार सौम्या विश्वनाथनची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सौम्या विश्वनाथनला ३० सप्टेंबर २००८ च्या दिवशी पहाटे ३.३० ला हत्या करण्यात आली. ती आपल्या कारने घरी परतत होती. त्याचवेळी तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि तिला ठार करण्यात आलं. पोलिसांनी हा दावा केला की तिची हत्या लुटीच्या उद्देशाने झाली होती. या हत्या प्रकरणात रवि कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक, अजय कुमार आणि अजय सेठी यांना अटक करण्यात आली. २००९ पासून हे सगळे तुरुंगात आहेत. पोलिसांनी सगळ्या आरोपींवर मकोका लावला आहे.

जिगिषा घोष हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर

जिगिषा घोषचा मृतदेह पोलिसांना मिळाला तेव्हा सर्वात पहिला पुरावा आम्हाला मिळाला तो सीसीटीव्ही फुटेजचा. त्यानंतर आमच्या लक्षात आलं की आरोपीच्या हातावर टॅटू आहे. तसंच जिगिषाचं डेबिट कार्ड वापरुन आरोपींनी खरेदी केली होती. तसंच एका आरोपीकडे पोलिसांकडून चोरलेला वायरलेस होता. या सगळ्यामुळे हे आरोपी पकडले गेल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पोलीस अधिकाऱ्यांनी पुरावे शोधलेच. तसंच दिल्ली पोलिसांच्या ह्युमन इंटेलिजन्स नेटवर्कनेही यावर बारकाईने काम केलं. त्यामुळे कपूर आणि शुक्ला या दोघांना अटक करता आली. तसंच मलिकच्या हातावर टॅटू होता आणि कपूरकडे वायरलेस सेट. यामुळे हे आरोपी पकडले गेले. जिगिषाचं अपहरण केल्यानंतर आणि तिला लुटल्यानंतर या सगळ्यांनी तिची हत्या केली. तसंच तिचा मृतदेह फेकून दिला. तिच्याकडे असलेले पैसे लुटले आणि डेबिट कार्डने खरेदीही केली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.