महाकुंभमेळ्यातील एका आखाड्यामध्ये अचानक लागलेल्या आगीमध्ये सापडून शुक्रवारी आणखी एका व्यक्तीचा बळी गेला आणि दोन व्यक्ती जखमी झाल्या. गेल्या रविवारी अलाहाबाद रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत ३६ भाविकांचा मृत्यू झाला होता.
वसंत पंचमीच्या निमित्ताने शाहीस्नानासाठी अनेक भाविक गंगा किनारी जमले आहेत. शुक्रवारी पहाटे सेक्टर क्रमांक ४ मधील एका आखाड्यात आग लागली. सुमारे १० तंबू आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेनंतर लगेचच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत्युमुखी पडलेली व्यक्ती ही आपल्या तंबूत झोपली होती आणि आग लागल्याचे तिला पटकन समजले नाही. त्यामुळेच तिचा मृत्यू झाला, असे प्राथमिक तपासातून दिसून आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा