रामनवमीनिमित्त देशभर जल्लोष साजरा करण्यात आला. परंतु, या जल्लोषाला पश्चिम बंगालमध्ये गालबोट लागले आहे. रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत दगडफेक करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथील शक्तीपूर परिसरात हा हिंसाचार घडला. यामुळे या भागात १४४ कलमान्वये संचारबंदी लागू करण्यात आली.

या घटनेचे व्हीडिओ समोर आले आहेत. त्यानुसार, मिरवणुकीत घरांच्या छतावरून दगडफेक केली जात असल्याचं दिसत आहे. परिणामी, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितलं की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून अतिरिक्त फौजफाटा या भागात रवाना करण्यात आला आहे. तर, जखमींना बेहरामपूर येथील मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

vishal gawli
कल्याण पूर्वेत बालिका अत्याचार हत्येमधील कुटुंबीयांच्या घरासमोर तरुणांची दहशत; “जामीन झाला नाहीतर एके ४७ बंदूक घेऊन येतो…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Court comments on demolishing rehabilitation building in Maharashtra Sadan objecting to municipality actions
महाराष्ट्र सदन प्रकरणातील पुनर्वसन इमारत पाडण्याच्या कारवाईवर न्यायालयाचे ताशेरे
Vishnu Gupta Attack
अजमेर दर्ग्याखाली शिव मंदिर असल्याचा दावा करणाऱ्या विष्णू गुप्तांच्या कारवर गोळीबार, थोडक्यात बचावले
Torres Scam Case, High Court, police, Torres Scam,
टोरेस घोटाळा प्रकरण : कार्यतत्परतेत पोलिसांकडून कसूर, पोलिसांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे पुन्हा ताशेरे
Three policemen injured during action against illegal huts in Jogeshwari Mumbai print news
जोगेश्वरीत अवैध झोपड्यांवरील कारवाईदरम्यान तीन पोलीस जखमी; परिसरात तणावाचे वातावरण
Crime Branch and Vitthalwadi Police arrested two Bangladeshis in Ulhasnagar news
उल्हासनगरात आणखी दोन बांगलादेशी पकडले,गुन्हे शाखा आणि विठ्ठलवाडी पोलिसांची कारवाई
accused akshay shinde encounter
अन्वयार्थ : हत्येचा गुन्हा दाखल कराच

भाजपाची काँग्रेसवर टीका

परंतु, भाजपाच्या बंगाल युनिटने याप्ररकणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरच आरोप केला आहे. “प्रशासनाची सर्व योग्य परवानगी असलेल्या शांततापूर्ण रामनवमी मिरवणुकीवर शक्तीपूर येथील बेलडांगा – II ब्लॉक, मुर्शिदाबाद येथे हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी पोलिसांनी या भीषण हल्ल्यात हल्लेखोरांना सामील करून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मिरवणूक थांबवण्यासाठी आणि रामभक्तांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या”, असे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी म्हणाले.

भाजपाला काँग्रेसचं प्रत्युत्तर

बेरहामपूरचे खासदार आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी संध्याकाळी येथे भेट दिली. भाजपाच्या आरोपावर काँग्रेसने प्रत्युत्तर दिलं आहे. “ही दंगल भाजपाकडून पूर्वनियोजित होती. आणि भाजपाच्या निषेधाने ते सिद्ध होते. मी निवडणूक आयोगाशी यासंदर्भात बोललो आहे. शक्तीपूरला अतिरिक्त फौजफाटा रवाना करण्यात आला आहे आणि पोलीस अधिक्षकही घटनास्थळी आहेत. मी निवडणूक आयोगाच्या सतत संपर्कात”, असं रंजन चौधरी म्हणाले.

ममता बॅनर्जींनी दिला होता इशारा

रामनवमीनिमित्त दंगल घडू शकते, असा इशारा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आधीच दिला होता. त्यानंतर मुर्शिदाबादमध्ये ही घटना घडली. “आजही भाजपाच्या सूचनेनुसार मुर्शिदाबादचे डीआयजी बदलण्यात आले. आता मुर्शिदाबाद आणि मालदा येथे दंगल झाली तर त्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असेल. भाजपाला दंगल आणि हिंसाचार घडवण्यासाठी पोलीस अधिकारी बदलायचे होते. जर एकही दंगल झाली तर निवडणूक आयोग जबाबदार असेल कारण ते येथे कायदा आणि सुव्यवस्था पाहत आहेत”, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.

Story img Loader