भारताचा एक मोठा शत्रू पाकिस्तानात मारला गेला आहे. लष्कर-ए-तैयबाचा माजी कमांडर अकरम खान उर्फ अकरम गाझी याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अकरम हा सातत्याने भारताविरोधात प्रक्षोभक भाषणं करायचा. २०१८ ते २०२० या तीन वर्षाच्या काळात तो लष्करमध्ये तरुणांना भरती करण्याचं काम करत होता. अकरम गाझी याला गुरुवारी (९ नोव्हेंबर) पाकिस्तानच्या बाजौर भागात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून त्याची हत्या केली आहे. गाझीवर गोळ्या झाडून हल्लेखोर तिथून पळून गेले अकरम हा लष्करच्या काही वरिष्ठ कमांडर्सपैकी एक होता. अनेक वर्ष तो भारतविरोधी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता.

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात दहशतवादी संघटनांशी संबंधित, भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्याचं सत्र सुरू आहे. अकरम गाझीची हत्या होण्यापूर्वी अलिकडच्या काही महिन्यांमध्ये मुफ्ती कैसर फारूक, खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवड, एजाज अहमद अहंगर, बशीर अहमद पीरसारख्या काही दहशतवाद्यांच्या अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केल्या आहेत.

Loksatta anvyarth Discussion between Prime Minister Narendra Modi and US President Joe Biden on Bangladesh issue
अन्वयार्थ: गोंधळ, गोंधळी यांना थारा नकोच!
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
protest against netyanahu in israel
ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये आंदोलन पेटले; कारण काय? मारले गेलेले सहा ओलिस कोण होते? त्यांची हत्या का करण्यात आली?
Outrage in Israel over hostage killing
ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये संताप,नेतान्याहू जबाबदार असल्याचा आरोप; युद्ध थांबवण्याची मागणी
west bengal bandh violence
West Bengal : पश्चिम बंगालमधील ‘बंद’ला हिंसक वळण; तृणमूल-भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, गोळीबार झाल्याचाही दावा, नेमकं काय घडतंय?
china condemns balochistan attacks support for pakistan s counter terrorism efforts
बलुचिस्तानमधील हल्ल्यांचा चीनकडून निषेध; पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कारवाईचे समर्थन
bangladesh interim govt head muhammad yunus assured safety security of hindus
Muhammad Yunus on Hindu Safety : मोहम्मद युनूस यांच्याकडून हिंदूंच्या सुरक्षेचे आश्वासन
How did Indian mango reach China and Pakistan?; India and China face off over mangoes
India-China mango history:आंबा भारताचा, श्रेय घेतंय पाकिस्तान आणि उत्पादनात अग्रेसर चीन; भारतीय आंबा व्हाया पाकिस्तान चीनमध्ये पोहोचलाच कसा?

पाकिस्तानात सातत्याने होत असलेल्या या हत्यांमुळे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांची झोप उडाली आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानात भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहिद लतीफची हत्या करण्यात आली होती. अज्ञात हल्लेखोरांनी सियालकोट भागात लतीफची गोळ्या घालून हत्या केली होती. लतीफ हा भारतातल्या पठाणकोट येथील वायूदलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागचा मास्टरमाईंड होता. तो पाकिस्तानात बसून पठाणकोटवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना निर्देश देत होता. त्यानेच त्या चारही दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन भारतात पाठवलं होतं.

हे ही वाचा >> पाकिस्तानातून परदेशी जाणाऱ्यांना मनस्ताप, ‘या’ कारणामुळे नागरिकांना पासपोर्ट मिळेना

सियालकोटजवळच्या एका मशिदीत शाहीदची हत्या करण्यात आली. दोन हल्लेखोर मोटारसायकलवरून आले, त्यांनी शाहीदवर गोळ्या झाडल्या आणि तिथून फरार झाले. या हत्याकांडानंतर पोलिसांनी सियालकोट भागात नाकाबंदी केली. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन हाती घेतलं. परंतु, या हत्येला महिना उलटला तरी अद्याप हल्लेखोर पाकिस्तानी पोलिसांच्या हाती लागले नाहीत.