अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. “जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी”, अशी टॅगलाईन असलेल्या एलआयसी विमा कंपनीवर कोट्यवधी भारतीयांचा विश्वास आहे. त्यामळेच आपल्या कष्टाची कमाई लोक एलयासीमधील पॉलिसीमध्ये गुंतवत असतात. पण हा लोकांचा पैसा एलआयसीने अदाणी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवला. ज्यावरुन गेल्या काही दिवसांत विरोधकांनी बरीच टीका केली. काँग्रेसने तर देशभरात एलयआयसीच्या कार्यालयासमोर आंदोलन देखील केले. आता अदाणी समूहातील गुंतवणूकीबद्दल भारतीय जीवन बिमा निगम अर्थात एलआयसीकडून मोठे विधान समोर आले आहे. एलआयसीचे चेअरमन एम. आर. कुमार यानी बिझनेस टुडेशी बोलताना सांगितले की, “एलआयसीच्या पॉलिसीधारकांनो आणि एलआयसीचे शेअर्स घेतलेल्या लोकांनो घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांनी त्यांच्या गुंतवणुकीबाबत निश्चिंत राहावे.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा