केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून देशात असहिष्णुतेच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या विरोधकांच्या दाव्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संसदेत खंडन केले. हा आरोप निराधार असल्याचे ते म्हणाले. तसेच देशातील सलोख्याचे वातावरण बिघडवू पाहणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
देशात राहण्यायोग्य वातावरण नसल्याचे चित्र निर्माण करणे म्हणजे देशाची प्रतिमा मलीन करून परकीय गुंतवणुकीला खीळ घालण्यासारखेच आहे, असेत्यांनी सांगितले. दादरी घटना आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यास सरकार तयार असल्याचे ते म्हणाले. असहिष्णुतसंबंधी संसदेतील चर्चेला उत्तर देताना त्यांनी लेखक, कलाकार आणि वैज्ञानिकांना त्यांनी परत केलेले पुरस्कार पुन्हा स्वीकारण्याची विनंती केली.
First published on: 02-12-2015 at 04:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha discussion on intolerance rajnath singh targeted over a quote that wasnt