बारासात (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारवर तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केला. ‘मत जिहाद’ला प्रोत्साहन देण्यासाठी इतर मागासवर्गीय (ओबीसी) तरुणांचे हक्क हिरावून घेतल्याचा आरोप बारासात येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधानांनी केला.

हेही वाचा >>> “रविवारची सुट्टी ख्रिश्चनांमुळे मिळाली, पण आता शुक्रवार…”, पंतप्रधान मोदींची झारखंडमध्ये टीका

PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
कोण आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई? गुजरातमध्ये यूसीसीचा मसुदा कोण तयार करणार? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
UCC in Gujarat : कोण आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई? गुजरातमध्ये यूसीसीचा मसुदा कोण तयार करणार?
Amit Shah
Delhi Election : ‘त्यांनी फक्त दारूची दुकानं उघडली’, अमित शाहांची मनीष सिसोदियांवर सडकून टीका
Supreme Court On Mahakumbh Stampede
Supreme Court : “ही दुर्दैवी घटना, पण…”, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार, याचिकाकर्त्याला दिले ‘हे’ आदेश
veteran actor amol palekar remark in jaipur literature festival 2025
जयपूर साहित्य महोत्सव :सध्या सरकारविरोधात जो बोलतो तो देशद्रोही; अमोल पालेकर यांचे परखड मत
Draupadi Murmu and sonia gandhi
Sonia Gandhi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या भाषणावर सोनिया गांधींची टीका, म्हणाल्या, “भाषण करताना…”
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान

मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित केल्याबद्दल टीका केली. ते म्हणाले, ‘‘तृणमूलने बंगालमधील ओबीसींशी केलेला विश्वासघात न्यायालयाने उघड केला आहे. ७७ मुस्लीम जातींना ओबीसी म्हणून घोषित करणे बेकायदा आणि घटनाबाह्य असल्याचे कोलकाता उच्च न्यायालयाने म्हटले आहे. म्हणजेच मत जिहादींना मदत करण्यासाठी तृणमूलने लाखो ओबीसी तरुणांचे हक्क रातोरात लुटले. तृणमूलने राज्यातील ओबीसी समाजाचा विश्वासघात केल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले, ‘‘येथील न्यायाधीशांच्या हेतूवर आणि आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मला तृणमूलच्या लोकांना विचारायचे आहे की, ते आता न्यायाधीशांच्या मागेही त्यांचे गुंड सोडतील का? तृणमूल बंगालमधील न्यायव्यवस्थेचा कसा गळा घोटत आहे याकडे संपूर्ण देश पाहत आहे.’’

Story img Loader