बारासात (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारवर तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केला. ‘मत जिहाद’ला प्रोत्साहन देण्यासाठी इतर मागासवर्गीय (ओबीसी) तरुणांचे हक्क हिरावून घेतल्याचा आरोप बारासात येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधानांनी केला.

हेही वाचा >>> “रविवारची सुट्टी ख्रिश्चनांमुळे मिळाली, पण आता शुक्रवार…”, पंतप्रधान मोदींची झारखंडमध्ये टीका

Arvind Kejriwal Bail
Arvind Kejriwal Bail : ‘कार्यालयात जाता येणार नाही, फाईल्सवर सही करता येणार नाही’, केजरीवालांना न्यायालयाने कोणत्या अटींवर जामीन मंजूर केला?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Girish Mahajan, High Court, Girish Mahajan news,
मंत्री गिरीश महाजनांवर उच्च न्यायालयाची नाराजी, काय आहे प्रकरण?
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
Mamata Banerjee is aggressive in the Assembly on the safety of women
विधेयकाच्या आडून भाजप लक्ष्य, विधानसभेत ममता बॅनर्जी आक्रमक; प. बंगालमध्ये ‘अपराजिता’ कायदा
Sugarcane, Delhi High Court, Supreme Court,
ऊस दराचा लढा दिल्ली उच्च न्यायालयात; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Kolkata Nabanna March Updates Today| Nabanna March Kolkata Doctor Sexual Abuse and Murder Case
Nabanna March Kolkata : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधातील आंदोलन चिघळले, पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्याचा वापर!
Journalist Woman Rape Case During Badlapur Incident Urgent hearing on Vaman Mhatre pre arrest bail
बदलापूर घटनेदरम्यान पत्रकार महिला विनयभंगाचे प्रकरण: शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंच्या अटकपूर्व जामिनावर तातडीने सुनावणी घ्या

मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित केल्याबद्दल टीका केली. ते म्हणाले, ‘‘तृणमूलने बंगालमधील ओबीसींशी केलेला विश्वासघात न्यायालयाने उघड केला आहे. ७७ मुस्लीम जातींना ओबीसी म्हणून घोषित करणे बेकायदा आणि घटनाबाह्य असल्याचे कोलकाता उच्च न्यायालयाने म्हटले आहे. म्हणजेच मत जिहादींना मदत करण्यासाठी तृणमूलने लाखो ओबीसी तरुणांचे हक्क रातोरात लुटले. तृणमूलने राज्यातील ओबीसी समाजाचा विश्वासघात केल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले, ‘‘येथील न्यायाधीशांच्या हेतूवर आणि आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मला तृणमूलच्या लोकांना विचारायचे आहे की, ते आता न्यायाधीशांच्या मागेही त्यांचे गुंड सोडतील का? तृणमूल बंगालमधील न्यायव्यवस्थेचा कसा गळा घोटत आहे याकडे संपूर्ण देश पाहत आहे.’’