पीटीआय, भोपाळ

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी काँगेसचे नेते दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्यांचा उल्लेख ‘शोले’ चित्रपटातील पात्र ‘जय’ व ‘वीरू’ असा केला. लुटलेल्या लूटच्या वाटपावरून ‘जय’ व ‘वीरू’ यांची आपापसात भांडणे चालू आहेत, अशी टीका त्यांनी केली.

bjp pradipsinh Jadeja marathi news
गुजरातच्या माजी गृहमंत्र्यांकडे पिंपरी-चिंचवडची जबाबदारी, अजित पवार यांच्या बालेकिल्याकडे भाजपची नजर
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
NCP ajit pawar group,Dharmarao Baba Atram eldest daughter join sharad pawar group
राष्ट्रवादीच्या जेष्ठ मंत्र्याच्या घरातच फूट, मुलगी लवकरच शरद पवार गटात…सोबत जावयानेही….
What Sanjay Raut Said About Devendra Fadnavis?
Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवरायांचं राज्य लयाला नेणाऱ्या पेशवाईचे..”, संजय राऊत यांची टीका
sambhaji brigade workers staged a strong protest in front of sculptor jaideep apte house in kalyan
शिल्पकार जयदीप आपटे यांच्या कल्याणमधील घराला काळे फासले; संभाजी ब्रिगेडची आपटेंच्या घरासमोर निदर्शने
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…
Ramdas Kadam, Ravindra Chavan,
रविंद्र चव्हाण कुचकामी मंत्री, त्यांचा राजीनामा फडणवीस यांनी घ्यायला हवा, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची टीका

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी पक्षाचे मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंग यांची अनुक्रमे अमिताभ बच्चन आणि धर्मेद्र यांनी साकारलेली ‘जय’ आणि ‘वीरू’ या पात्रांची बरोबरी केल्यानंतर त्यांची टीका झाली. काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, दिग्विजय सिंह आणि कमलनाथ मंगळवारी पक्ष नेतृत्वाची भेट घेण्यासाठी दिल्लीत आहेत.काँग्रेस नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री चौहान म्हणाले, ‘‘जय-वीरू जोडीला दिल्लीत बोलावण्यात आले.

हेही वाचा >>>राष्ट्रपतींची ‘मेजर’ कारवाई! संरक्षण दलाच्या ‘या’ विभागातील अधिकाऱ्याची तडकाफडकी हकालपट्टी

त्या दोघांच्या मतभेदांबाबत भाजप संभ्रम निर्माण करत असल्याचे हे दोनही नेते सांगतात. मग काँग्रेस नेतृत्वाने त्यांना दिल्लीत का बोलावले. ‘जय’ व ‘वीरू’ लुटलेल्या मालावरून आपापसात भांडत आहेत. २००३च्या आधी दिग्विजय सिंह यांनी संपूर्ण राज्य लुटले आणि उद्ध्वस्त केले. तर १५ महिन्यांच्या राजवटीत कमलनाथ यांनीही मध्य प्रदेशला लुटीचे केंद्र बनविले. आता त्यांच्यात वाद आहे की लुटीचा पुढचा भाग कोणाला,  किती वाटा मिळणार यावरून आहे.’’

सुरजेवाला यांनी शनिवारी सांगितले की, दिग्विजय व कमलनाथ यांच्यातील नातेसंबंध ‘शोले’मधील धर्मेद्र (वीरू) आणि अमिताभ बच्चन (जय) यांनी साकारलेल्या पात्रांमधील होते. गब्बर सिंग या दोघांमध्ये भांडण लावू शकला नाही. त्याप्रमाणे भाजपचे  गब्बर सिंगही असे करू शकणार नाही.