भगवान श्रीरामाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा आज अयोध्येतील राम मंदिरात करण्यात आली. ५०० वर्षांपासून या दिवसाची प्रतिक्षा होती. अखेर भगवान श्रीरामाची मूर्ती राम मंदिरात विराजमान झाली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राम मंदिर तिथंच बांधलंय जिथं बांधण्याचा संकल्प केला होता, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

“आज भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नाहीयेत. मन भावूक झालं आहे. तुम्हाला सगळ्यांनाही हेच वाटत असेल. या ऐतिहासिक आणि पावन क्षणी भारतातलं प्रत्येक ठिकाण अयोध्याधाम आहे. प्रत्येक मार्ग राम जन्मभूमीच्या दिशेने येत आहे”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

shiv sena bjp conflict over regularizing construction built by project victims in navi mumbai and panvel
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर नवी मुंबईत महायुतीतच धुसफुस ?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Ajit Pawar, Ajit Pawar rebuked municipal commissioner,
“तुम्ही सगळं मुख्यमंत्र्यांकडे ढकलून देऊ नका”! तरुणीच्या अर्जावरुन अजित पवारांनी पालिका आयुक्तांना खडसावलं
rohit pawar on ajit pawar confession
Rohit Pawar : “ज्या पक्षाने कुटुंब फोडलं, त्यांना…”; अजित पवारांच्या ‘त्या’ कबुलीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया!
aditya thackeray
Aditya Thackeray : “मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही”, म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला; म्हणाले…
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…
women s safety top national priority pm modi at lakhpati didi sammelan
महिला सुरक्षेला प्राधान्य; जळगावमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, अत्याचार रोखण्यासाठी केंद्राकडून सहकार्याची ग्वाही

“प्रत्येकाच्या मनात राम-नाम आहे. प्रत्येकाचे डोळ्यांत आनंदाश्रू आहेत. पूर्ण राष्ट्र राममय आहे. असं वाटतंय आपण त्रेतायुगात आलो आहोत. आज रघुनंदन सिंहासनाव विराजमान झाले आहेत. आज प्रसन्नता आणि संतोषाचे भावना आहेत. भारताला याच दिवसाची प्रतिक्षा होती. या दिवसाची आपण पाच शतके वाट पाहत होतो”, असं ते म्हणाले.

हेही वाचा >> Ram Mandir Ayodhya Inauguration Live: मी आज प्रभू श्रीराम यांची माफी मागतो, कारण…- नरेंद्र मोदी

समाजातील सर्व जाती वर्गाने राम मंदिरासाठी प्रयत्न केले

श्रीराम जन्मभूमी हे असं पहिलं प्रकरण असेल, जिथे एखाद्या देशात त्या देशातील बहुसंख्यांक समाजाने त्यांच्या मंदिर निर्माणासाठी एवढी वर्षे लढाई लढली असेल. समाजातील सर्व जाती वर्गाने राम मंदिरासाठी प्रयत्न केले. आज शेवटी तो दिवस आलाच. आज आत्मा प्रफुल्लित आहे. मंदिर तिथंच बनवलं आहे जिथं बनवण्याचा संकल्प केला होता, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

“संकल्प आणि साधनेच्या सिद्धीसाठी, आपली प्रतिक्षा संपवण्याकरता आणि संकल्पाच्या पूर्णतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार आणि अभिनंदन”, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले. “अयोध्या नगरीत आता गोळ्यांचा गडगडाट नसेल, संचारबंदी लागणार नाही”, असं आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी दिलं.