रेल्वे प्रवास भाडे निश्चिती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी केली खरी, परंतु त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला चाट पडण्याची शक्यता जास्त आहे. यापूर्वी प्रवास भाडे रेल्वे मंत्रालय निश्चित करीत असे. आता मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरात होणाऱ्या चढउतारांची दखल घेऊन रेल्वे भाडे प्राधिकरण भाडेवाढीचा निर्णय घेईल. भाडे निश्चितीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा करीत खरगे यांनी या प्रक्रियेत पारदर्शकता आणल्याचा दावा केला.
‘कभी चिलमन (पडदा) में वो झाँके..कभी चिलमन में हम झाँके. लगा दो आग चिलमन में..न वो झाँके; न हम झाँके.’ हा शेर ऐकवत ‘हमने चिलमन में आग लगा दी’ अशी भावना खरगे यांनी व्यक्त केली. सध्याच्या रेल्वे भाडे निश्चिती प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचेच खरगे यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. यापूर्वी प्रवास भाडे निश्चित करण्याची प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे चालत असे. यापुढे या प्रक्रियेचे संचालन स्वतंत्र प्राधिकरणाद्वारे होईल. त्यामुळे रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. दिल्लीत झालेल्या अरुणाचल प्रदेशच्या युवकाच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना अरुणाचलची राजधानी ईटानगरदेखील रेल्वे नकाशात दिसेल. शिलाँगपर्यंत रेल्वे नेण्यात येईल. आपल्या भाषणात खरगे यांनी रेल्वे कर्मचारी भरतीचा कोठेही उल्लेख केला नाही.
वैष्णोदेवी यात्रेसाठी कटरापर्यंत रेल्वे नेण्याची घोषणा त्यांनी केली. मात्र काश्मीर ते लडाख रेल्वेमार्गासंबंधी खरगे यांनी अवाक्षरही काढले नाही. चार वर्षांत सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावाच अर्थसंकल्पात सादर केला गेला. अकराव्या पंचवार्षिक योजनेत निश्चित केलेल्या २ हजार २७ किलोमीटर नवीन, ४ हजार ५५६ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण केल्याचा दावा खरगे यांनी केली.
गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांमध्ये राज्य व केंद्र सरकारच्या आर्थिक भागीदारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे ते म्हणाले. त्यात कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड व हरयाणा या राज्यांचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा