पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधासाठी एकत्र आलेल्या पक्षांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली आहे. या आघाडीची आता पुढची बैठक मुंबईत होणार असल्याचं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केलं. तसंच, या आघाडीला INDIA (Indian National Development Inclusive Alliance) हे नाव दिलं असल्याचंही आज जाहीर करण्यात आलं. यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे.

हेही वाचा >> पंतप्रधान मोदींच्या विरोधात अखेर विरोधकांची एकजूट झाली; आघाडीचं नाव ठरलं INDIA! वाचा सविस्तर…

CM Mamata Banerjee at JR doctors protest place near Swasthya
Kolkata Rape Case : “हा माझा शेवटचा प्रयत्न”, आंदोलकांच्या भेटीला गेलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा आंदोलक डॉक्टरांना इशारा!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Crime against three who tie down man in house even after repaying the loan
कर्जाची परतफेड केल्यानंतरही घरात डांबणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा
Hindenburg on Madhabi Puri Buch
Hindenburg on Madhabi Puri Buch: “माधबी पुरी बूच गप्प का?”, ‘हिंडेनबर्ग’ने सेबीच्या अध्यक्षांवर नवा आरोप करत उपस्थित केला सवाल
ladki bahin yojana funny video
“मम्मी पप्पांचा पूर्ण पगार घेऊन त्यांचं ऐकत नाही अन् सरकारला वाटतं की १५०० रुपयांमध्ये त्यांचं ऐकेल..” चिमुकलीचा Video होतोय व्हायरल
Sainath tare joined uddhav Thackeray s shivsena
कल्याण: बलात्काराचा गुन्हा दाखल साईनाथ तारे यांना ठाकरे गटात प्रवेश दिल्याने तीव्र नाराजी
uddhav thackeray latest marathi news,
“सरकार उलथून टाकण्यासाठी एकत्र या”, उद्धव ठाकरे यांचे सरपंचांना आवाहन
rape victim strips publicly
Rape Victim Strips Publicly: बलात्कार पीडितेनं भररस्त्यात कपडे काढून व्यक्त केला संताप; पोलिसांच्या नाकर्तेपणावर आगपाखड, अखेर आरोपी अटकेत

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “आजची बैठक चांगली झाली. आजपासून खरं आव्हान सुरू झालं आहे. आमच्या २६ पक्षांच्या बैठकीत आघाडीला INDIA नाव देण्याचं ठरलं आहे. तुम्ही आधी युपीए नाव ऐकलं. एनडीए आताही आहे. पण प्रत्यक्षात हे अस्तित्वात नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेकांचं जीवन धोक्यात आहे. अल्पसंख्याक, बहुसंख्याक, मुस्लिम, शीख, ईसाई, दिल्ली, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगाल, महाराष्ट्र सर्वच धोक्यात आहेत. सरकार विकणं आणि सरकार खरेदी करणं हेच सरकारचं काम आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी खरं आव्हान स्वीकारलं आहे”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

“NDA CAN U CHALLENGE INDIA (एनडी इंडियाला आव्हान देऊ शकतं का?), BJP CAN YOU CHALLENGE INDIA (भाजपा इंडियाला चॅलेंज देऊ शकतं का?), CAN ANYBODY CHALLENGE INDIA (कोणी इंडियाला चॅलेंज करणार का?) आम्ही आमच्या देशावर प्रम करतो. देशप्रेमींवर आम्ही प्रेम करतो. आम्ही विद्यार्थी, शेतकरी, दलित, अर्थव्यवस्थेसाठी काम करतो. आम्ही देशासाठी आणि जगासाठी आहोत. यापुढे सर्व कार्यक्रम, जाहिरात इंडिया या बॅनर अंतर्गत होणार. जर तुम्हाला आव्हान द्यायचंय तर द्या”, असा एल्गारही ममता बॅनर्जी यांनी पुकारला.

हेही वाचा >> विरोधकांच्या INDIA ची पुढची बैठक मुंबईत, मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा; म्हणाले, “२६ पक्ष एकत्र आल्याने पंतप्रधानांचे…”

“आपत्कालीन घटनेपासून देशाला वाचवा. देशातील जनतेला वाचवा. आम्हाला इंडियाला वाचवायचं आहे, आम्हाला देशाला वाचवायचं आहे. भाजपा देश विकण्यासाठी सौदागिरी करतंय. लोकशाहीला खरेदी करण्याची सौदागिरी सुरू आहे. स्वतंत्र्य यंत्रणांनाही काम करू देत नाहीत”, असंही ममता बॅनर्जी म्हणाले.