Manipur Violence : भारताच्या ईशान्येकडील मणिपूर हे राज्य गेल्या तीन महिन्यापासून धगधगतंय. खरंतर भारतातलं अतिशय सुपीक, हिरवंगार आणि केवळ ३० लाख लोकसंख्या असलेले एक सुंदर राज्य आहे. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून या राज्यात अभूतपूर्व असा हिंसाचार पेटला आहे. मैतेई आणि कुकी या दोन समुदायांमध्ये दीर्घ काळ चाललेल्या संघर्षानं टोक गाठलं आहे. मणिपूर आता गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर आहे, असे म्हणण्यापर्यंत मजल गेली आहे. मणिपूरमधील हिंसाचार थांबावा यासाठी केंद्र सरकार, भारतीय लष्कर प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयदेखील त्यांची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे.

मणिपूरमधील हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. कायद्याच्या राज्यावर लोकांचा विश्वास पुन्हा निर्माण व्हावा, लोकांमध्ये आत्मविश्वासाची भावना निर्माण व्हावी यासाठी न्यायालय शक्य ते सगळे प्रयत्न करत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मणिपूरमध्ये सध्या मदत, उपचार, पुनर्वसन, प्रार्थना स्थळांचा जीर्णोद्धार आणि महिलांसाठी जी कामं सुरू करण्यात आली आहेत. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी, याप्रकरणी योग्य त्या सूचना देण्यासाठी देशातल्या तीन उच्च न्यायालयांच्या तीन माजी मुख्य न्यायाधीशांची एक समिती गठित केली आहे.

Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Badlapur Harassment case Suspension of Thane Education Officers for evading case responsibility Mumbai news
बदलापूर अत्याचार प्रकरण: जबाबदारी झटकल्याने ठाणे शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा
mumbai high court Nagpur Bench
आकस्मिक निधीत सहकार्याची मागणी भ्रष्टाचार नव्हे…कोर्टाच्या एका निर्णयाने लाचखोरीच्या आरोपीला…
construction houses mangroves, state government,
खारफुटीवर घरे बांधल्याच्या तक्रारीच्या तपासणीचे राज्य सरकारला आदेश
Thane education officer, suspension,
ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबनाबाबत तूर्त दिलासा नाही, राज्य सरकारला राक्षे यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी
west Bengal rapist death penalty marathi news
बलात्काऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद – ममता बॅनर्जी; ‘लवकरच कायद्यात सुधारणा’

या समितीमध्ये न्यायमूर्ती गीता मित्तल (जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश), न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी (मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश) आणि न्यायमूर्ती आशा मेनन (दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश) यांचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाने लैंगिक हिंसाचाराशी संबंधित ११ गुन्हे सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जे तपास पथक असेल त्यामध्ये पोलीस उपअधीक्षक दर्जाचे ५ अधिकारी असतील. न्यायालयाने म्हटलं आहे की, सीबीआयच्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करून सुरक्षेचा स्तर वाढवायला हवा. त्यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसळगीकर यांची नेमणूक केली जावी. पडसळगीकर हे पर्यवेक्षक अधिकारी म्हणून काम पाहतील.

हे ही वाचा >> भगवान शिवाचा अवतार समजून मद्यधुंद व्यक्तीने महिलेबरोबर केलं भयंकर कृत्य; खळबळजनक घटना समोर

एकंदरीत मणिपूर हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चार व्यक्तींवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये दत्तात्रय पडसळगीकर आणि माजी न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांचा समावेश आहे.