भारताच्या विकासासाठी एका अंबानी आणि अदानीने काही होणार नाही. त्यासाठी देशात १० हजार अंबानी आणि २० हजार अदानी तयार झाले पाहिजेत. भारताने जी-२० परिषदेच्या संधीचा उपयोग देशाला प्रगतीसाठी करावा. ही संधी पुन्हा कधीच मिळणार नाही, असे प्रतिपादन भारताचे जी-२० परिषदेचे सदस्य आणि निती आयोगाचे माजी साईओ अमिताभ कांत यांनी व्यक्त केलं.

जी-२० परिषदेचे अध्यक्षपद यंदा भारताकडे आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जी-२० परिषदेच्या अधिकृत चिन्हाचे पदार्पण करण्यात आलं. तेव्हा जी-२० परिषदेचे अधिकारी आणि उद्योगपती यांच्याशी अमिताभ कांत यांनी संवाद साधला. जी-२० परिषदेचे भारताकडे असलेले अध्यक्षपद हे उद्योगपतींशी संवाद साधण्याची मोठी संधी आहे, असेही अमिताभ कांत यांनी नमूद केलं.

Prime Minister Modi will distribute 18th PM Kisan and fifth Namo Shetkari installments on 5th october
आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार ३९०० कोटी जाणून घ्या, कोणत्या योजनेचे किती पैसे मिळणार
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
India freedom movement book Dethroned Patel Menon and the Integration of Princely India
एकसंध भारत घडताना…
Nitin Gadkari
Nitin Gadkari : “राजकीय पक्षासारखं काम करणं बंद करा”; नितीन गडकरींनी ‘भारतीय रोड काँग्रेस’ला सुनावलं!
Piyush Goyal
Piyush Goyal : ‘…म्हणून मला माझ्याच घरात पाच वर्ष प्रवेश करता आला नव्हता’, मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितला घर विकत घेतानाचा अनुभव
Justice Sirpurkar, Hyderabad encounter,
हैदराबाद एन्काउंटरची चौकशी करणारे न्यायमूर्ती म्हणाले, “जलद न्यायाच्या मागे लागू नका…”
MP supriya sule criticize deputy cm ajit pawar in pimpri chinchwad
सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला… म्हणाल्या, “पिंपरी- चिंचवडचा कारभारी वेगळा होता म्हणून…”
iran supreme leader statement
इराणच्या सर्वोच्च नेत्याकडून भारतातील मुस्लिमांबाबत वादग्रस्त टिप्पणी; परराष्ट्र मंत्रालयानेही सुनावले खडे बोल; म्हणाले…

हेही वाचा : मोठी बातमी! फरार नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; लंडन कोर्टानं दिले आदेश!

“जागतिक पुरवठा साखळीचा भाग बनण्याची ही संधी आहे. भारताला अव्वल दर्जाचे उत्पादन करणारे राष्ट्र बनवायचे असते तर, उद्योग वाढले पाहिजेत. प्रगतिशिवाय भारताचा विकास होऊ शकत नाही. जागतिक आव्हानांत भारताने जी-२० परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारलं आहे. प्रभावी कृतीने प्रत्येक आव्हान आम्ही संधीत बदलू शकतो,” असेही अमिताभ कांत यांनी म्हटलं.