Meerut building collapse : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये तीन मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून १३ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं असून आणखी काही जणं ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या घटनेची दखल घेतली असून अधिकाऱ्यांना तत्काळ मदतीचे निर्देश देण्यात आले आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री मेरठच्या झाकीर कॉलनी इथं ही दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे तीन मजली इमारत कोसळली आहे. या घटनेत आठ जणांना मृत्यू झाला आहे. इमरातीच्या ढिगाऱ्याखालून १३ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. या पैकी काही जण किरकोळ जखमी आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. महत्त्वाचे म्हणजे आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांचा संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Married Man Marries 15 Women in seven Indian States
Crime News : आधुनिक लखोबा! १५ जणींशी लग्न, सात राज्यांमधल्या बायकांना प्रायव्हेट फोटो दाखवून करायचा ब्लॅकमेल
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : “दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार”, अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा
Asaduddin-Owaisi-1
ताजमहलच्या गळतीवरून असदुद्दीन ओवेसींचे भारतीय पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धीवर ताशेरे; म्हणाले, “हे म्हणजे १० वीत नापास विद्यार्थ्याने…”
prashant kishor on bihar liquor ban
“बिहारमध्ये सत्ता आल्यास, तासाभरात दारुबंदी उठवू”; जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांची घोषणा
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
National Green Tribunal
National Green Tribunal : ‘एनजीटी’च्या न्यायमूर्तींनी मुलाला ॲमिकस क्युरी म्हणून नियुक्त केल्याचा आरोप; याचिका दाखल, काय आहे प्रकरण?

हेही वाचा – Taj Mahal Leakage: मुसळधार पावसामुळे ताजमहालच्या मुख्य घुमटातून गळती सुरू; नुकसानाबाबत पुरातत्व विभागाने दिली माहिती

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला आहे. या पावसामुळे ३०५६ घरांचं मोठं नुकसान झालं असून इमारती कोसळण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या आठवड्यातही पावसामुळे लखनौमधील तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली होती.. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला होता. तर २४ जण जखमी झाले होते.

हेही वाचा – कालिंदी एक्सप्रेसचा अपघात घडवून आणण्याचा कट? कानपूरमध्ये रेल्वे रुळावर सापडला गॅस सिलिंडर, थोडक्यात अनर्थ टळला

या घटनेनंतरही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी तत्काळ दखल घेत अधिकाऱ्यांना तातडीने मदतीच्या सुचना देण्यात आल्या होत्या. तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही दु:ख व्यक्त केलं होतं. लखनौमधील इमारत कोसळल्याची घटना दुर्देवी आहे. या घटनेची माहिती मिळताच, अधिकाऱ्यांना मदतीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सद्यस्थिती बचावकार्य सुरू असून आम्ही स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

दरम्यान, उत्तर प्रदेशात मुळधार पावसामुळे आलेल्या पुरात वाहून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. त्याचबरोबर पशूधनाचंही मोठं नुकासान झालं आहे. त्या कुटुंबांनादेखील मदतनिधी देण्यात आली आहे.