Mehbooba Mufti Jammu Kashmir News : जम्मू काश्मीरच्या डोडा भागात भारतीय लष्कर व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाले आहेत. या घटनेवरून जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी जवान काश्मीरमध्ये येतात, मात्र इथून परत जातं ते त्यांचं पार्थिव…तेही शवपेटीतून… मोदी सरकार म्हणतंय की काश्मीर खोऱ्यातला दहशतवाद संपलाय, मग काश्मीरमध्ये आपल्या जवानांना कोण मारतंय? या सर्व घटनांना कोण जबाबदार आहे? जम्मूत सध्या जे काही घडतंय त्याची जबाबदारी हे सरकार घेणार आहे का?”

मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, “जम्मूत सध्या काय घडतंय? तिथलं वातावरण कोणामुळे बिघडलंय? तिथे मोठ्या प्रमाणात हत्या होत आहेत, आपले जवान मारले जात आहेत. गृहमंत्र्यांनी (अमित शाह) या घटनांची जबाबदारी घ्यावी. गेल्या अनेक महिन्यांपासून हे सगळं घडतंय, मात्र गृह मंत्रालयाने याबाबत चकार शब्द उच्चारलेला नाही. गेल्या ३२ महिन्यांमध्ये जम्मू-काश्मीर अशांत आहे. प्रामुख्याने नव्या पोलीस महासंचालकांची नियुक्ती झाल्यापासून इथलं वातावरण दूषित झालं आहे.”

Mamata Banerjee is aggressive in the Assembly on the safety of women
विधेयकाच्या आडून भाजप लक्ष्य, विधानसभेत ममता बॅनर्जी आक्रमक; प. बंगालमध्ये ‘अपराजिता’ कायदा
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Himanta Biswa Sarma
CM Himanta Sarma : “आसामला धमकवण्याची तुमची हिंमत कशी झाली?” ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ विधानवरून मुख्यमंत्री सरमा यांचा हल्लाबोल!
Nagpur st employees marathi news
एसटी कामगार पुन्हा रस्त्यावर… कृती समिती काय म्हणते…
Balasaheb Shivarkar demanded that the ladaki bahin scheme should be implemented for all
‘लाडकी बहीण’ बाबत माजी राज्यमंत्र्यांची मोठी मागणी म्हणाले…!
Karnataka Chief Minister Siddaramaiah addresses the Legislative Party meeting
कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग, मुख्यमंत्र्यांकडून गुरुवारी विधिमंडळ पक्ष बैठक; राज्यपालांच्या भूमिकेने वाद
eknath shinde and ajit pawar 4
स्वाक्षरीवरून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये धुसफूस
Water cat vulture buffalo breeding center in Maharashtra state
राज्यात पाणमांजर, गिधाड, रानम्हैस प्रजनन केंद्र; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री म्हणाल्या, “सीमेवर आपले काश्मिरी बांधव नाहीत, मुसलमानही नाहीत, पत्रकार व व्यापारी देखील नाहीत. तुम्हीच (केंद्र सरकार व भारतीय लष्कर) देशाच्या सीमा सुरक्षित करता. मग देशात होणारी घुसखोरी रोखण्याची जबाबदारी कोणाची आहे? ही स्थानिक सुरक्षा बलाची जबाबदारी नाही. तुम्ही तुम्हाला वाट्टेल तसा अपप्रचार करत आहात, गेल्या सहा वर्षांपासून तुम्ही काश्मीरमध्ये अपप्रचार केलात, त्यातून काय साध्य केलंत? आता तुम्हाला उत्तर काश्मीरमध्ये मोठा धक्का बसला आहे.”

security forces on high alert in jammu and kashmir due to hidden terrorism
(संग्रहित छायाचित्र)

हे ही वाचा >> “देवीनं स्वप्नात येऊन मला आदेश दिले”, म्हणत स्वयंघोषित बाबानं उत्तराखंडमध्ये १६५०० फुटांवर बांधलं मंदिर; पवित्र कुंडाचा स्वीमिंग पूल…

पोलीस महासंचालकांना बडतर्फ करण्याची मागणी

पीडीपी प्रमुख म्हणल्या, “काश्मीरवर होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांची सरकारने जबाबदारी घेतलेली नाही. त्यांनी योग्य वेळी येथील पोलीस महासंचालकांना बडतर्फ करायल हवं होतं. गेल्या ३२ महिन्यांत काश्मीर खोऱ्यात आपण आपले ५० हून अधिक जवान गमावले आहेत. परंतु, हे सरकार त्या जवानांची देखील जबाबदारी घेत नाही. सध्याचे पोलीस महासंचालक केवळ राजकीयदृष्ट्या निर्णय घेत आहेत. ते पीडीपी पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ते स्थानिक नागरिकांना, पत्रकारांना त्रास देत आहेत, धमक्या देत आहेत. तसेत ते मौलवींना ब्लॅकमेल करत आहेत.”