लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी (२५ मार्च) सहावी यादी जाहीर केली. यामध्ये राजस्थानधील चार उमेदवारांचा समावेश आहे, तर तामिळनाडूमधील एका उमेदवाराचा समावेश आहे. याआधी काँग्रेसने महाराष्ट्रातील काही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. अशातच आसाममध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातील नोबोईचा या विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत नराह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

पत्नीला लोकसभा तिकीट न दिल्याने राजीनामा

आमदार भरत नराह यांनी त्यांच्या पत्नी राणी नराह यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र, पक्षाकडून त्यांना तिकीट मिळाले नाही. काँग्रेसने लखीमपूर लोकसभा मतदारसंघासाठी उदय शंकर हजारिका यांना उमेदवारी जाहीर केली. राणी नराह या लखीमपूरमधून तीन वेळा खासदार राहिलेल्या आहेत. मात्र, तरीही राणी नराह यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Former MLA Vaibhav Naik and his wife Sneha Naik summoned for questioning by the Anti-Corruption Department in Ratnagiri
माजी आमदार वैभव नाईक व पत्नी स्नेहा नाईक यांना लाचलुचपत विभागाने रत्नागिरीत चौकशीसाठी बोलावले
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी देणारे ८ आमदार कोण? त्यांनी भाजपात प्रवेश का केला? (फोटो सौजन्य पीटीआय)
Political News : आम आदमी पार्टीच्या ८ विद्यमान आमदारांनी भाजपात प्रवेश का केला?
Delhi Assembly Elections 2025 Seven AAP MLAs resign
‘आप’च्या सात आमदारांचे राजीनामे; पक्ष नेतृत्व विचारसरणीपासून दूर जात असल्याचा आरोप
Dhananjay Munde Beed Guardian Minister
Dhananjay Munde: “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर…”, दिल्लीमध्ये भेटीगाठी घेतल्यानंतर धनंजय मुंडे काय म्हणाले?
Raigad Guardian minister post , Aditi Tatkare ,
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना – राष्ट्रवादीत खडाखडी 

हेही वाचा : तृणमूलच्या महुआ मोईत्रांविरुद्ध भाजपाकडून प. बंगालमध्ये राजमाता अमृता रॉय रिंगणात!

भरत नराह सहावेळा आमदार राहिले

आमदार भरत नराह यांच्याकडे आसाम काँग्रेसच्या मीडिया सेलचे अध्यक्षपद होते. मात्र, त्यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या मीडिया सेलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आज काँग्रेस पक्षाच्या सदस्याचा राजीनामा दिला आहे. आमदार भरत नराह हे तब्बल सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. भरत नराह हे त्यांच्या पत्नी राणी नराह यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झाले होते.

राणी नारा होत्या प्रबळ दावेदार

आसामच्या लखीमपूर लोकसभेसाठी राणी नराह या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. याआधी त्या या मतदारसंघातून तीन वेळा विजयी झाल्या होत्या. तसेच त्या एकवेळा राज्यसभेवरही निवडून गेल्या होत्या. याबरोबरच केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणूनही काम केले होते.

Story img Loader