आज माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. तसंच एम. एस. स्वामीनाथन आणि माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनाही पुरस्कार जाहीर झाला. काँग्रेसने या निर्णयाचं कौतुक केलं आहे. मात्र ठाकरे गटाने बाळासाहेब ठाकरेंचा मोदी सरकारला विसर पडल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी एक पोस्ट लिहून मोदी सरकारवर टीका केली.

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?

हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा एकदा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण झाले…आधी दोन आणि आता एकदम तीन असे एका महिन्यात पाच नेत्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात आले…पण त्यात ना वीर सावरकर ना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे! खरं तर नियम असा आहे की एका वर्षात जास्तीत जास्त तीन भारतरत्न देता येतात. मोदींनी एका महिन्यात पाच जणांना भारत रत्न जाहीर केले… निवडणुकांची धामधूम.दुसरे काय?

News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
uddhav thackeray loksatta news
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत यांनी मांडली भूमिका
ashish shelar uddhav thackeray (2)
“करगोटा निसटायच्या वयात…”, शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “अमित शाहांच्या पाठीवर वळ…”

कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण आडवाणी यांच्या मागोमाग आता चौधरी चरण सिंग.पी वी नरसिंहराव आणि एम एस स्वामिनाथन यांना भाररत्न ने सन्मानित केले….आणखी काही नेते प्रतीक्षेत आहेत.पण मा.बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण का? ज्यांनी सारा भारत हिंदुमय केला…ज्यांच्यामुळे मोदी अयोध्येत राममंदिर सोहळा करू शकले. असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

संजय राऊत यांनी ही पोस्ट करण्यापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपण बाळासाहेब ठाकरेंचा वैचारिक वारस आहोत त्या नात्याने ही मागणी करतो आहोत की बाळासाहेब ठाकरे यांना मोदी सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा. अशी एक पोस्ट लिहून मागणी केली आहे. पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं. अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

Story img Loader