नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविववारी आरोप केला की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार रेल्वेला ‘अक्षम’ सिद्ध करू इच्छित आहे. सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची असलेली रेल्वे आपल्या ‘मित्रांना’ विकण्याचे प्रयत्न सुरू असून रेल्वे वाचविण्यासाठी मोदी सरकार दूर करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर एक चित्रफीत प्रसारित केली, ज्यामध्ये लोक शौचालय व ट्रेनमधील बर्थवर बसून सरकारवर टीका करत आहेत. ‘‘नरेंद्र मोदींच्या राजवटीत रेल्वे प्रवास शिक्षा बनला आहे. सर्वसामान्यांच्या गाडयांमधून जनरल डबे कमी करून ‘एलिट ट्रेन्स’चा प्रचार करणाऱ्या मोदी सरकारकडून प्रत्येक क्षेणीतील प्रवाशांना त्रास दिला जात आहे. कन्फर्म तिकीट असूनही प्रवाशांना आरामशीर प्रवास करता येत नाही,’’ असे राहुल गांधी यांनी सांगितले.

PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
Police Officer mixes ash in food for devotees Viral Video
Maha Kumbh 2025 : पोलिसाने महाकुंभमेळ्यातील भाविकांसाठी शिजवल्या जाणाऱ्या अन्नात कालवली राख; Video Viral झाला अन्…
pune survey conducted of city dilapidated unused dilapidated public toilets
पिंपरी : वापरात नसलेली सार्वजनिक शौचालये पाडणार
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Muramba
Video: “ही रमाच आहे की…”, माहीच्या ‘त्या’ कृतीमुळे अक्षयला येणार संशय; ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट
dombivli municipal corporation loksatta news
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात पालिकेच्या स्वच्छता दुतांच्या उपद्रवाने नागरिक हैराण

हेही वाचा >>> इंडिया सत्तेत आल्यास ‘सीएए’ रद्द करणार! माकपच्या टीकेवर चिदम्बरम यांचा खुलासा

मोदी सरकारला आपल्या धोरणांनी रेल्वे दुर्बळ करून ती अकार्यक्षम असल्याचे सिद्ध करायचे आहे, जेणेकरून त्यांना ती त्यांच्या मित्रांना विकण्यासाठी बहाणा मिळेल असा आरोप राहुल यांनी केला आहे.

घटलेल्या मजुरीवरून मोदींवर टीका

दरम्यान, काँग्रेसने रविवारी मजुरांच्या घटलेल्या वेतनाचा मुद्दा उपस्थित करत त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याची टीका केली. भाववाढीशी तुलना करता मजुरांच्या वेतनामध्ये अभूतपूर्व घट झाली आहे. ‘इंडिया’ आघाडी सत्तेवर आल्यावर देशाच्या विकासाचा दर पुन्हा वाढेल असे पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले. रमेश यांनी केंद्र सरकाराच्या अधिकृत आकडेवारीसह अनेक डेटा स्रोतांचा संदर्भ देऊन टीका केली की, मजूर १० वर्षांपूर्वी जितक्या वस्तू खरेदी करू शकत होते त्यापेक्षा आज कमी करू शकतात.

Story img Loader