भारत-म्यानमान सीमेवर तब्बल १६४३ किमी लांबीचे कुंपण घालण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंदर्भातील माहिती दिली. देशाच्या सरक्षेच्या दृष्टीने हे मोठे पाऊल मानले जात आहे. म्यानमारमधून लोक अवैधरित्या प्रवेश करत होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, मोदी सरकार सुरक्षित सीमा निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. या संदर्भात भारत-म्यानमारच्या १६४३ किमी लांबीच्या सीमेला कुंपण घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय गस्तीसाठी स्वतंत्र ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. मणिपूरमधील मोरेहपासून १० किमी लांबीचे कुंपण पूर्ण झाले आहे. याशिवाय हायब्रीड सर्व्हिलन्स सिस्टिमद्वारे कुंपण घालण्याच्या इतर दोन पथदर्शी प्रकल्पांवर काम केले जात आहे. त्यांच्या बाजूने अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्येही दहा किलोमीटरचे कुंपण बांधले जाणार आहे. याव्यतिरिक्त, मणिपूरमध्ये सुमारे २० किमीच्या कुंपणाच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे आणि लवकरच काम सुरू होईल.

Loksatta explained Why are political leaders killed Apart from politics there are other reasons behind the murder
राजकीय नेत्यांच्या हत्या का होतात? हत्येमागे अनेकदा राजकारण वगळता ‘अन्य’ कारणेच?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Government blood banks in Mumbai violated e blood bank rules
सरकारी रक्तपेढ्यांकडूनच नियम धाब्यावर, रक्तसाठ्याची नोंद करण्यास टाळाटाळ; दंड भरण्याकडेही दुर्लक्ष
Loksatta anvyarth Ten years in jail on charges of Naxalism G N Death of Sai Baba
अन्वयार्थ: व्यवस्थारक्षणासाठी तरी मानवाधिकार राखा!
Badlapur case, school trustees Badlapur case,
बदलापूर प्रकरण : …तर शाळेच्या विश्वस्तांना अद्याप का शोधू शकला नाहीत ? उच्च न्यायालयाचा पोलिसांना संतप्त प्रश्न
Action against cyber thieves by Central Crime Investigation Department Pune print news
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून सायबर चोरट्यांविरुद्ध कारवाई; पुण्यासह देशभरात ३२ ठिकाणी छापे, २६ जणांना अटक
online rummy, High Court, State Govt,
ऑनलाईन रमी हा खेळ संधीचा की कौशल्याचा भाग ? राज्य सरकाला भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
navi mumbai police registered case under pocso act against youth for child sexual abuse
नवी मुंबई : बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा

हा निर्णय घेण्यामागे अनेक कारणे आहेत. मानवी तस्करी, अंमली पदार्थाचा व्यापार, बेकायदेशीर स्थलांतर या काही समस्या आहेत. ज्यांनी गेल्या काही वर्षांत भारत सरकारसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या सर्व बेकायदा कृत्यांना कुंपण घालण्याचा सरकारचा हेतू आहे.