भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्याइतका राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचा अद्यापही गंध नाही, असे मत काँग्रेसच्या प्रवक्त्या रेणुका चौधरी यांनी व्यक्त केले आहे. जयललिता या मोदी यांच्या तुलनेत राजकारणातील ‘बडय़ा खिलाडी’ आहेत. त्यामुळे जयललिता यांच्याशी चर्चा करताना मोदी यांची डाळ शिजणार नाही, असेही चौधरी यांनी म्हटले आहे. मोदी अध्याय आताच सुरू झाला असून त्यांना राष्ट्रीय राजकारण अद्याप कळू लागलेले नाही. नरेंद्र मोदी यांचा प्रादेशिक पक्षांकडून पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न असतानाच रेणुका चौधरी यांनी वरील मत व्यक्त केले आहे.
मोदींनी गुजरातला कर्जात बुडवले
गुजरातच्या विकास प्रारूपाचे वाभाडे काढताना काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी, या राज्यातील दरडोई कर्ज हे सर्वात जास्त आहे, अशी टीका केली. तर  प्रत्युत्तरादाखल, मोदींच्या काळात दरडोई कर्ज ३९ टक्क्य़ांवरून १९ टक्क्य़ांवर आल्याचे भाजपाने म्हटले आहे.