तापमानात झालेली वाढ आणि उकाड्यामुळे सध्या सगळेच जण हैराण झाले आहेत. प्रत्येक जण सध्या मान्सूनची वाट बघतो आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. येत्या २४ तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – मान्सून आला हे नक्की कसे समजते? मान्सून ऑनसेट म्हणजे काय? जाणून घ्या…

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या २४ तासांत नैऋत्यू मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वीच हवामान विभागाने यंदाचा मान्सून ३१ मे ते १ जून दरम्यान केरळात दाखल होईल, असं सांगितलं होतं. मात्र, आता एक दिवस आधीच मान्सून केरळात दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून केरळमध्ये दाखळ होण्यासाठी अरबी समुद्र आणि हिंदी महासागरामध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढच्या ७ ते ८ दिवसांत महाराष्ट्रात दाखल होईल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा – विदर्भात मोसमी पाऊस केव्‍हा दाखल होणार? हवामान तज्‍ज्ञांनी सांगितले…

केरळमध्ये गेल्या १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यात मार्च-मे दरम्यान ४६५ मिमी पाऊस पडला आहे. ज्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक पाऊस केवळ मे महिन्यात झाला आहे. यावर्षी, बंगालच्या उपसागरात मान्सून मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सून लवकर पोहोचण्यास मदत होईल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. ईशान्य भारतात ५ जूनपर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon will likely hit kerala coast in 24 hours said india meteorological department spb
Show comments