नरेंद्र मोदी हे आत्ममग्न नेते असून पंतप्रधान पदाच्या आकांक्षेच्या स्वप्नाने त्यांना पछाडले असल्याची टीका केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्री सचिन पायलट यांनी केली आहे.
जनतेत भेद निर्माण करण्याचा हिंदुत्ववादी अजेंडा हीच मोदींची खरी भूमिका असून विकास आणि योग्य प्रशासन हा मोदींनी निर्माण केलेला भ्रम असल्याचेही पायलट म्हणाले. “आता भारतीय जनता भावनिक मुद्द्यांच्या पलीकडे पाहण्यास शिकली आहे. भारत हा आता आधुनिक युवा पिढीचा देश आहे. भारतीय जनतेला आता मंदिर व मशिदींपेक्षा अधिक महाविद्यालये हवी आहेत. मोदी पंतप्रधान पदाच्या स्वप्नात पछाडले गेले असल्याने ते योग्य गोष्ट जाणून घेऊ शकत नाहीत” असेही सचिन पायलट म्हणाले.