Gujarat Riots 2002 : गोध्रा जळीतकांडानंतर (२००२) गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलींमध्ये नरोडा पाटिया गावातील मुस्लिमांची घरे पेटवून देण्यात आली होती. या हल्ल्यात ११ लोकांचा मृत्यू झाला होता. या खटल्यात भाजपाच्या माजी आमदार माया कोडनानी, बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी, विश्व हिंदू परिषदेचे नेते जयदीप पटेल हे प्रमुख आरोपी होते. यांच्यासह इतर ६९ जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्वांची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीकास्र सोडलं आहे. गुजरात दंगलीत ज्यांची हत्या झाली, त्यांची हत्या तर झालीच. मात्र, कालच्या निर्णयामुळे देशात संविधानाचीही हत्या झाली, असं विधान शरद पवार यांनी केलं. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात बोलत होते.

residents allege conspiracy to hinder adarsh nagar colony rehabilitation project in worli mumbai
खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी मोकाट; पुनर्वसन प्रकल्प बंद पाडण्याचे षडयंत्र, रहिवाशांचा आरोप
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Youth beaten up for watching news against Valmik Karad and Dhananjay Munde two accused arrested from Karnataka
“कराड, मुंडेंविरोधातील बातम्या का पाहतो”; तरुणाला मारहाण करणारे दोघे आरोपी कर्नाटकातून ताब्यात
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?

नरोडा हत्याकांड प्रकरणावर न्यायालयाने दिलेल्या निकालावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, “देशात दररोज काहीतरी घडतंय. आज एक बातमी आहे की, काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये अल्पसंख्याकांच्या हत्या झाल्या. हल्ले झाले. यामध्ये काही लोक मृत्यूमुखी पडले. ही जातीय दंगल होती. या जातीय दंगलीमागे गुजरातमधील सत्ताधारी पक्ष होता. यामध्ये अनेकांना अटक झाली. हे प्रकरण अनेक दिवस चाललं.”

हेही वाचा- नरोडा पाटिया हत्याकांड; भाजपाच्या माया कोडनानी, VHPचे जयदीप पटेल, बजरंग दलाचे बाबू बजरंगी यांची निर्दोष मुक्तता

“पण या प्रकरणात ज्या लोकांना अटक झाली, त्यांना लगेच जामीन देण्यात आला. हा खटला वर्षोनुवर्षे चालला. यानंतर काल उच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि सगळ्यांना निर्दोष सोडलं. मग त्यावेळी ज्या लोकांच्या हत्या झाल्या? त्या हत्या कशा झाल्या? जर कुणी हल्लाच केला नसेल, तर हत्या कशा होतील? ज्यांची हत्या झाली त्यांची हत्या तर झालीच. पण एका दृष्टीने या देशात जो कायदा आहे, जी कायद्याची व्यवस्था आहे. त्या कायदा आणि संविधानाचीही हत्या झाली.हे कालच्या निकालावरून स्पष्ट झाली आहे,” असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.

Story img Loader