पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त एक लेख लिहिला आहे. या लेखातून देबरॉय यांनी भारतीय राज्यघटना बदलली पाहिजे, असं भाष्य केलं आहे. लिखित राज्यघटनेचं वय १७ वर्षे असतं, असा तर्कही त्यांनी संबंधित लेखातून मांडला आहे. एवढ्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्याने अशाप्रकारे लेख लिहिल्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहे.

हा लेख प्रकाशित झाल्यानंतर केंद्र सरकारनेही विवेक देबरॉय यांच्यापासून अंतर राखलं आहे. तर संबंधित लेखातून मांडलेले विचार विवेक देबरॉय याचं वैयक्तिक मत आहे, असं स्पष्टीकरण आर्थिक सल्लागार परिषदेनं दिलं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर बसलेल्या व्यक्तीच्या मनात असा विचार आलाच कसा? असा सवाल आव्हाडांनी विचारला. त्यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

Prime Minister Narendra Modi Home Minister Amit Shah visit Thane district
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा ठाणे जिल्हा दौरा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
Justice Sirpurkar, Hyderabad encounter,
हैदराबाद एन्काउंटरची चौकशी करणारे न्यायमूर्ती म्हणाले, “जलद न्यायाच्या मागे लागू नका…”
Nana Patole gave a reaction about becoming Chief Minister
नाना पटोले म्हणतात, “मी मुख्यमंत्री व्हावे…”
mahayuti will contest assembly elections under the leadership of cm eknath shinde says ajit pawar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक; अजित पवार यांची माहिती
Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
TMC MP Jawhar Sircar
TMC MP Jawhar Sircar : तृणमूल काँग्रेस अन् खासदारकीचा राजीनामा देण्याचं कारण काय? जवाहर सरकार यांनी केलं मोठं भाष्य

हेही वाचा- “काँग्रेसचा मोठा गट महायुतीत जाणार”, वडेट्टीवारांचा उल्लेख करत शिवसेनेच्या खासदाराचा मोठा दावा

हेही वाचा- “…हा माणूस प्रत्यक्षात अत्यंत कृतघ्न निघाला”, वळसे-पाटलांच्या शरद पवारांवरील टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले, “पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त लिहिलेल्या लेखात म्हटलंय की, “भारतीय राज्यघटना बदलली पाहिजे.” पण एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीच्या मनात हा विचार आलाच कसा? लिखित राज्यघटनेचं वय १७ वर्षे असतं, असा अजब तर्क त्यांनी मांडला आहे. ही मंडळी घटनेचा मूळ गाभा असलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि लोकशाही यांना विरोध का बरं करत असावी? काही भलता-सलता हेतू तर नाही ना या मागे? शेवटी मी म्हणेन… तुम्ही किती बी करा रे हल्ला… लय मजबूत आहे आमच्या भीमाने लिहिलेल्या संविधानाचा किल्ला… #SaveConstitution”